शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

देशी वृक्ष संवर्धनासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

By admin | Updated: March 21, 2016 00:42 IST

संघटनात्मक प्रयत्न : खंबाळे, बोलवाड येथील जैवविविधता पार्कच्या माध्यमातून पोषक वातावरण निर्मिती

शरद जाधव -- सांगली‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ वृक्षांना आपला सखा-सोयरा समजा, असे सांगणाऱ्या या अभंगातून झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित होते. मात्र, आज झाडांची बेसुमार होणारी कत्तल आणि पर्यावरणाचा ऱ्हास याचा दुष्परिणाम आपणाला भोगावा लागत आहे. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने का होईना, झाडे लावण्याचा आणि त्यांचे योग्य संगोपन करण्याचा मनोमन संकल्प करायलाच हवा. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मात्र देशी झाडांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न चालू झाले आहेत. सर्वसामान्यजनांना वनांचे आणि पर्यायाने झाडांचे महत्त्व समजावे, यासाठी वन दिन साजरा करण्यात येतो. मात्र, दुर्दैवाने समाजाला झाडांचे महत्त्व समजलेच नाही असे म्हणावे लागते. आपल्याला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू आपणाला उपलब्ध करुन देण्याची झाडांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, आपणच कोणताही विचार न करता झाडांची कत्तल करतो. यातून धोक्याची जाणीव होत असल्यानेच, कदाचित आता सर्वच भागात वृक्षांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न चालवले आहेत. सांगली जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास केला, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे होत आहेत. जिल्ह्यातील चांदोली, सागरेश्वर, दंडोबा, चौरंगीनाथ आदी ठिकाणची वृक्षसंपदा सर्वांनाच आकर्षित करते आहे. जैवविविधता पार्कच्या माध्यमातून जिल्ह्यात खंबाळे आणि बोलवाड याठिकाणीही नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण ठिकाणे तयार होणार आहेत. सध्या आपल्या अवतीभोवती दिसणारी बहुतांश झाडे ही परदेशी आहेत. त्यात प्रामुख्याने निलगिरी, सिल्व्हर ओक, गुलमोहर, गिरीपुष्प, काशीद, रेन ट्री, टॅबूबिया, सुरु आदी झाडे निश्चितच आपल्या सवयीची झाली असली आणि त्यांचा डेरेदारपणा, लक्षवेधी फुले आकर्षक असली तरी, त्यांचा आपणास उपयोग नसल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. या झाडांवर कधीही पक्षी राहत नाहीत, असा अनुभव आहे. त्यामुळे या परदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, करंज, तामण, बहावा, लिंब, पळस, पांगेरा, शिसव, चिंच, कवठ, उंबर, देशी जांभूळ, देशी आंबा आदी झाडांच्या संवर्धनासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व झाडांपासून माणसांना काही ना काही फायदा मिळणार आहे. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वृक्षांना घरातील एक सदस्य समजून त्यांची देखभाल केली, तरच आपला भविष्यकाळ सुखकर असणार आहे. झाडांच्या देखभालीसाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. येत्या होळी सणाच्यावेळी वृक्षांची तोड करून सण साजरा केला जाऊ नये. - पापा पाटील, वृक्षप्रेमी, सांगली.