शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशी वृक्ष संवर्धनासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

By admin | Updated: March 21, 2016 00:42 IST

संघटनात्मक प्रयत्न : खंबाळे, बोलवाड येथील जैवविविधता पार्कच्या माध्यमातून पोषक वातावरण निर्मिती

शरद जाधव -- सांगली‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ वृक्षांना आपला सखा-सोयरा समजा, असे सांगणाऱ्या या अभंगातून झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित होते. मात्र, आज झाडांची बेसुमार होणारी कत्तल आणि पर्यावरणाचा ऱ्हास याचा दुष्परिणाम आपणाला भोगावा लागत आहे. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने का होईना, झाडे लावण्याचा आणि त्यांचे योग्य संगोपन करण्याचा मनोमन संकल्प करायलाच हवा. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मात्र देशी झाडांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न चालू झाले आहेत. सर्वसामान्यजनांना वनांचे आणि पर्यायाने झाडांचे महत्त्व समजावे, यासाठी वन दिन साजरा करण्यात येतो. मात्र, दुर्दैवाने समाजाला झाडांचे महत्त्व समजलेच नाही असे म्हणावे लागते. आपल्याला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू आपणाला उपलब्ध करुन देण्याची झाडांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, आपणच कोणताही विचार न करता झाडांची कत्तल करतो. यातून धोक्याची जाणीव होत असल्यानेच, कदाचित आता सर्वच भागात वृक्षांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न चालवले आहेत. सांगली जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास केला, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे होत आहेत. जिल्ह्यातील चांदोली, सागरेश्वर, दंडोबा, चौरंगीनाथ आदी ठिकाणची वृक्षसंपदा सर्वांनाच आकर्षित करते आहे. जैवविविधता पार्कच्या माध्यमातून जिल्ह्यात खंबाळे आणि बोलवाड याठिकाणीही नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण ठिकाणे तयार होणार आहेत. सध्या आपल्या अवतीभोवती दिसणारी बहुतांश झाडे ही परदेशी आहेत. त्यात प्रामुख्याने निलगिरी, सिल्व्हर ओक, गुलमोहर, गिरीपुष्प, काशीद, रेन ट्री, टॅबूबिया, सुरु आदी झाडे निश्चितच आपल्या सवयीची झाली असली आणि त्यांचा डेरेदारपणा, लक्षवेधी फुले आकर्षक असली तरी, त्यांचा आपणास उपयोग नसल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. या झाडांवर कधीही पक्षी राहत नाहीत, असा अनुभव आहे. त्यामुळे या परदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, करंज, तामण, बहावा, लिंब, पळस, पांगेरा, शिसव, चिंच, कवठ, उंबर, देशी जांभूळ, देशी आंबा आदी झाडांच्या संवर्धनासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व झाडांपासून माणसांना काही ना काही फायदा मिळणार आहे. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वृक्षांना घरातील एक सदस्य समजून त्यांची देखभाल केली, तरच आपला भविष्यकाळ सुखकर असणार आहे. झाडांच्या देखभालीसाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. येत्या होळी सणाच्यावेळी वृक्षांची तोड करून सण साजरा केला जाऊ नये. - पापा पाटील, वृक्षप्रेमी, सांगली.