शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

केरळात घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त महाराष्ट्रापासून दीड हजार किलोमीटरवरील केरळात जाऊन मराठी व्यावसायिकांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त महाराष्ट्रापासून दीड हजार किलोमीटरवरील केरळात जाऊन मराठी व्यावसायिकांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले. मराठी बांधवांनी एकत्रित येऊन तेथील आडूर शहरात गणेशोत्सव साजरा केला. तेथे ‘गणपती बाप्पा मोरय्या’चा आवाज घुमला.

खानापूर, तासगाव, आटपाडी, खटाव, माण, सांगोला आदी तालुक्यातील मराठी बांधव सुवर्ण व्यवसायासाठी केरळ राज्यातील विविध शहरांत स्थायिक झाले आहेत. अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह वास्तव्यात असलेल्या मराठी बांधवांनी मराठी संस्कृती जोपासली आहे.

महाराष्ट्रात धडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव केरळ राज्यात स्थायिक असलेले मराठी बांधव भक्तिभावाने साजरा करीत असतात. केरळ राज्यातील आडूर शहरात ‘आडूरचा राजा’ गणेश मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाचे सातत्य कायम ठेवले आहे.

सुभाष पाटील, पोपट शिंदे, मोहन पाटील, तानाजी धनवडे, अधिक मोरे, उत्तम गोरड, शंकर थोरात, राजू शिंदे, प्रशांत पाटील, संजय पाटील, सुरेश सुर्वे, सचिन सूर्यवंशी, सुखदेव घोलप, विजय यादव, भरत साळुंखे, हेमंत थोरात, रमेश धनवडे, धनाजी घोलप, पृथ्वीराज माने, गोपीनाथ रावताळे यांनी नियोजन केले आहे.

चौकट :

आरतीचा मान नगराध्यक्षांना

मराठी बांधवांनी आडूर येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आडूरचे नगराध्यक्ष डी. सजी आणि उपसभापती चिट्टीयन गोपकुमार यांना आरतीचा मान दिला. त्यानंतर कोरोनायोध्दा म्हणून काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, पोलीस यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.