शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनहिरा’ची स्वच्छता ३० लाखात फत्ते

By admin | Updated: February 9, 2015 01:14 IST

यांत्रिकी विभागाचे कौशल्य : खातेअंतर्गत कामामुळेच कोट्यवधीची बचत

प्रताप महाडिक- कडेगाव -कडेगाव तालुक्यातील सोनहिरा ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी बाजारमूल्याप्रमाणे १ कोटी ५० लाख रुपये खर्च येत होता. इतका मोठा निधी मिळणे अशक्य असल्याने गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी ‘नावीन्यपूर्ण योजना’ म्हणून ५० लाखांचा निधी मंजूर करीत हे काम शासनाच्या जलसंपदा विभागाकडे सोपविले. जलसंपदा विभागाने त्यांच्याकडील यांत्रिकी विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत हे काम ५० टक्के दराने केले. आता सोनहिरा स्वच्छता मोहीम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत. आतापर्यंत केवळ २० लाख रुपये खर्च आला आहे. यापुढे १० लाख रुपये खर्च होईल. केवळ ३० लाखांच्या खर्चात १ कोटी ५० लाख खर्चाचे काम पूर्ण होत आहे. खातेअंतर्गत काम दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीतील १ कोटी २० लाख रुपयांची बचत झाली.सोनसळ हद्दीतील सोनहिरा ओढ्याच्या उगमस्थानापासून रामापूर हद्दीतील सोनहिरा ओढा, वेरळा नदी संगमापर्यंत २२ कि.मी. लांबीच्या ओढ्यात गारवेल आणि काटेरी झाडाझुडपांचे साम्राज्य होते. पाण्याचा प्रवाह थांबला होता. साठून राहिल्यामुळे पाणी दूषित झाले होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. दोन वर्षापूर्वी मोहनराव कदम यांनी श्रमदानातून सोनहिरा स्वच्छता मोहीम सुरू केली. परंतु श्रमदानातून प्रचंड मोठे काम अशक्य होते. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम यांनी या कामात लक्ष घातले आणि ५० लाखांच्या निधीतून या कामास प्रारंभ झाला.यांत्रिकी विभाग कोल्हापूूर येथील पोकलॅन यंत्राच्या साहाय्याने सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे, चिंचणी, आसद, देवराष्ट्रे, रामापूर आदी गावांच्या हद्दीत सोनहिरा ओढ्याचे पात्र संपूर्ण स्वच्छ केले आहे. आता मोहित्यांचे वडगाव ते देवराष्ट्रे हे साधारणपणे ३ किलोमीटर लांबीचे काम अपूर्ण आहे, तर १९ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’ या त्यांच्या जीवनचरित्रात सांगितल्याप्रमाणे सोनहिरा खळखळ वाहत आहे. लहान मुले ओढ्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. ताकारी योजनेचे पाणीही सोनहिरा ओढ्यात सोडले आहे. महिला कपडे धुण्यासाठी सोनहिरा काठावर जात आहेत. यांत्रिकी विभाग कोल्हापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोनहिरा काठावरील शेतकऱ्यांशी संवाद साधून कुशलतेने हे काम फत्ते केले. यांत्रिकी विभाग कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता मिलिंद मोरे, कार्यकारी अभियंता जयंत खाडे, उपअभियंता विकास कुचेकर, उपअभियंता पी. आर. चव्हाण यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली यंत्रचालक कुमार गोरंबेकर, तसेच कर्मचाऱ्यांनी हे दर्जेदार व उल्लेखनीय काम केले. याशिवाय याच योजनेत १५ किलोमीटर लांबीचे उपनाले स्वच्छ केले. चिंचणी येथील बेलगंगा हा उपनाला याच नावीन्यपूर्ण योजनेनुसार बचत झालेल्या २० लाखांच्या खर्चातून करून घ्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून केली आहे.