शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या उत्सवाला सामाजिक रंग

By admin | Updated: September 21, 2015 00:05 IST

दुष्काळाचे भान : रुग्णसेवा, अन्नदान, शालेय साहित्य वाटपासारख्या उपक्रमांवर भर--गणेशोत्सव २0१५

सांगली : जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन शहरातील लहान-मोठ्या मंडळांनी आपल्या खर्चामध्ये काटकसर करुन, तो निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यावर भर दिला आहे. वर्गणीतून गोळा झालेला निम्म्याहून अधिक निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याचा निर्णय बहुतांशी मंडळांनी घेतला आहे. पटेल चौक मित्रमंडळाने यावर्षीही रक्तदान शिबिर घेतले आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे, अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी यंदा पाऊण लाख खर्च करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अजित सूर्यवंशी यांनी दिली. मोटार मालक संघटना प्रत्येकवर्षी सामाजिक उपक्रमांवर भर देते. त्यांच्याकडून कायमस्वरुपी रुग्णालय चालवण्यात येते. चालक, क्लिनरसाठी मोफत औषधोपचार करण्यात येतात. यंदा शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वखार भागातील लक्ष्मीनारायण मंडळाच्यावतीने यावेळी अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण औषधोपचार करण्यात येणार आहे. यासाठी दोन अनाथाश्रम यावेळी ते दत्तक घेणार आहेत. वखारभागातीलच अष्टविनायक मंडळाने खर्चात काटकसर करुन शासकीय रुग्णालयातील गरजू लोकांवर औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मृत्यू पावलेल्यांचे पार्थिव त्यांच्या गावापर्यंत नेण्यासाठी मोफत शववाहिकेची सोय करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष केतन नावंधर यांनी दिली. कॉलेज कॉर्नरवरील शहीद भगतसिंग मंडळाने यंदा सलग दहा दिवस अन्नछत्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थापक शिवाजी खोत यांनी दिली. दररोज याचा दोन हजार भाविक लाभ घेत आहेत. गावभागातील रणझुंझार मंडळाने यावर्षी रक्तदान शिबिर तर घेतलेच आहेच, शिवाय खर्चात बचत करुन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचाही निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष संदीप हेरवाडे यांनी दिली. वखारभागातील मित्रमंडळाने यावर्षीही पर्यावरणपूरक देखाव्यावर भर दिला आहे. या मंडळाकडून निधीची बचत करुन दत्त जयंतीला अन्नदान करण्यात येणार आहे. शहरात ४६० मंडळांची प्रतिष्ठापनासांगलीत लहान-मोठ्या ४६० मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. पोलीस व महापालिकेच्या सूचनेनुसार यंदा मंडळांचे मंडपही जवळपास निम्म्यावर आले आहेत. गतवर्षीपेक्षा वीस ते पंचवीस मंडळांची संख्या घटली आहे. बहुतांशी मंडळांनी खर्चात काटकसर करुन सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. महापालिकेकडे मात्र दाखल झालेल्या अर्जावरून मंडळांची संख्या सहाशेवर गेल्याचे दिसत आहे.