शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

सांगलीच्या उत्सवाला सामाजिक रंग

By admin | Updated: September 21, 2015 00:05 IST

दुष्काळाचे भान : रुग्णसेवा, अन्नदान, शालेय साहित्य वाटपासारख्या उपक्रमांवर भर--गणेशोत्सव २0१५

सांगली : जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन शहरातील लहान-मोठ्या मंडळांनी आपल्या खर्चामध्ये काटकसर करुन, तो निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यावर भर दिला आहे. वर्गणीतून गोळा झालेला निम्म्याहून अधिक निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याचा निर्णय बहुतांशी मंडळांनी घेतला आहे. पटेल चौक मित्रमंडळाने यावर्षीही रक्तदान शिबिर घेतले आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे, अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी यंदा पाऊण लाख खर्च करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अजित सूर्यवंशी यांनी दिली. मोटार मालक संघटना प्रत्येकवर्षी सामाजिक उपक्रमांवर भर देते. त्यांच्याकडून कायमस्वरुपी रुग्णालय चालवण्यात येते. चालक, क्लिनरसाठी मोफत औषधोपचार करण्यात येतात. यंदा शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वखार भागातील लक्ष्मीनारायण मंडळाच्यावतीने यावेळी अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण औषधोपचार करण्यात येणार आहे. यासाठी दोन अनाथाश्रम यावेळी ते दत्तक घेणार आहेत. वखारभागातीलच अष्टविनायक मंडळाने खर्चात काटकसर करुन शासकीय रुग्णालयातील गरजू लोकांवर औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मृत्यू पावलेल्यांचे पार्थिव त्यांच्या गावापर्यंत नेण्यासाठी मोफत शववाहिकेची सोय करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष केतन नावंधर यांनी दिली. कॉलेज कॉर्नरवरील शहीद भगतसिंग मंडळाने यंदा सलग दहा दिवस अन्नछत्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थापक शिवाजी खोत यांनी दिली. दररोज याचा दोन हजार भाविक लाभ घेत आहेत. गावभागातील रणझुंझार मंडळाने यावर्षी रक्तदान शिबिर तर घेतलेच आहेच, शिवाय खर्चात बचत करुन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचाही निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष संदीप हेरवाडे यांनी दिली. वखारभागातील मित्रमंडळाने यावर्षीही पर्यावरणपूरक देखाव्यावर भर दिला आहे. या मंडळाकडून निधीची बचत करुन दत्त जयंतीला अन्नदान करण्यात येणार आहे. शहरात ४६० मंडळांची प्रतिष्ठापनासांगलीत लहान-मोठ्या ४६० मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. पोलीस व महापालिकेच्या सूचनेनुसार यंदा मंडळांचे मंडपही जवळपास निम्म्यावर आले आहेत. गतवर्षीपेक्षा वीस ते पंचवीस मंडळांची संख्या घटली आहे. बहुतांशी मंडळांनी खर्चात काटकसर करुन सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. महापालिकेकडे मात्र दाखल झालेल्या अर्जावरून मंडळांची संख्या सहाशेवर गेल्याचे दिसत आहे.