शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहल पाटील की योजना शिंदे?

By admin | Updated: July 8, 2016 00:55 IST

जि. प. अध्यक्ष निवड आज

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी स्नेहल पाटील की योजना शिंदे, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, शुक्रवारी सकाळी यावर शिक्कामोर्तब होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत इच्छुकांशी चर्चा केली. जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून अंतिम झालेल्या नावाचे पाकीट घेऊन मुंबईतून दोन पक्षनिरीक्षक सांगलीत येतील, अशी माहिती पवार यांनी दूरध्वनीवरून दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कार्यकाल संपण्यास केवळ आठ महिन्यांचा कालावधी राहिल्याने कमी कालावधीसाठी का होईना पद मिळावे, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वी ठरल्यानुसार तासगाव तालुक्यालाच अध्यक्षपद मिळणार असल्याने या तालुक्यातील स्नेहल पाटील (येळावी), योजना शिंदे (मणेराजुरी) आणि कल्पना सावंत (सावळज) यांची नावे चर्चेत होती. जिल्ह्यातील नेत्यांना नावावर शिक्कामोर्तब करण्यात अडचणी आल्याने गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी तिन्ही उमेदवारांना मुंबईत स्वतंत्र बोलावून त्यांचे शिक्षण, राजकीय पार्श्वभूमी याबाबत विचारणा केली. आगामी निवडणुका लक्षात घेता संधी मिळाल्यास केवळ मतदारसंघापुरते काम न करता जिल्हाभर काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पवार यांनी एकट्यानेच मुलाखती घेतल्या.इच्छुकांची संख्या जास्त असल्याने व एकमत होत नसल्याने राष्ट्रवादीने मागील आठवड्यात जिल्हा परिषद सदस्यांचाही कल जाणून घेतला होता. त्यासाठी प्रत्येक सदस्याने मत दिले होते. मुंबईतील मुलाखतीवेळी योजना शिंदे यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे तिन्ही सदस्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात असेपर्यंत तरी ही ‘मतपेटी’ फोडण्यात आली नव्हती. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी कॉँग्रेसकडूनही तयारी करण्यात आली असून, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, यावर रणनीती ठरविणार असल्याचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी सांगितले. त्यादृष्टीने गुरुवारी मोहिते यांच्यासह सम्राट महाडिक, रणधीर नाईक, भीमराव माने यांनी माजी मंत्री पतंगराव कदम यांची भेट घेतली. काँग्रेसकडून मीनाक्षी महाडिक अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.कॉँग्रेसने शुक्रवारी सकाळी दहा वाजता कॉँग्रेसच्या सदस्यांची बैठक आयोजित केली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली असून, यातच लाल दिवा कोणाला मिळणार, हे निश्चित होणार आहे. (प्रतिनिधी) ‘तयारी’ होत असेल तरच...गुरुवारी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते, रणधीर नाईक, सम्राट महाडिक आणि भीमराव माने यांनी माजी मंत्री पतंगराव कदम यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केली. यावर ‘तयारी’ होत असेल तरच निवडणूक लढवा, अन्यथा नको, अशी सूचना कदम यांनी केली आहे, तर सत्ताधारी गटाकडून कोणाचे नाव निश्चित होते, यावर रणनीती ठरविणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या बैठकीत समजणार नाव गुरुवारी मुंबईत अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून अंतिम नाव पक्षनिरीक्षकांमार्फत पाठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. सत्ताधारी गटाची सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतच नाव समजेल, असे सांगण्यात आले.