शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

धुराडी पेटली तरी ऊसतोडी ठप्पच..!

By admin | Updated: November 13, 2014 00:03 IST

टोळ्या दाखल : शनिवारच्या बैठकीकडे लक्ष

सांगली : जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी करून धुराडी पेटविली आहेत़ बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह जत, आटपाडी तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्याही ऊसपट्ट्यात दाखल झाल्या आहेत़ मात्र स्वाभिमानीसह अन्य शेतकरी संघटनांनी दर जाहीर केल्याशिवाय तोडी सुरू करण्यास विरोध दर्शविल्यामुळे तोडी ठप्प आहेत़ दरम्यान, ऊस दर नियंत्रण मंडळाची शनिवार, दि़ १५ रोजी मुंबईत बैठक होत असून याकडे शेतकरी, कारखानदार आणि ऊस तोडणी मजुरांचे लक्ष लागून राहिले आहे़जिल्ह्यातील तासगाव कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार नाही, हे निश्चित आहे़ शिराळा तालुक्यातील निनाईदेवी कारखाना दालमिया कंपनीने घेतला असून त्याचाही गळीत हंगाम सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत़ परंतु, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गळीत हंगाम सुरू करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे़ उर्वरित १६ कारखान्यांनी गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली आहे़ ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या ऊस पट्ट्यात दाखल झाल्या आहेत़ परंतु, दराचा प्रश्न सुटला नसल्यामुळे उसाच्या तोडी कारखान्यांनी अद्याप सुरू केलेल्या नाहीत़ पलूस, जत तालुक्यातील ऊसतोडी काही प्रमाणात सुरू होत्या़ तेथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तोडी बंद पाडल्या. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला गती मिळण्यासाठी ऊस दराचा प्रश्न सुटण्याची नितांत गरज आहे़ येत्या शनिवारी मुंबईत ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक होत आहे़ या बैठकीत कोणता निर्णय होणार, याकडेच शेतकरी, कारखानदार, ऊस तोडणी मजुरांचे लक्ष लागून राहिले आहे़ कोल्हापूर विभागात दहा कारखान्यांचे गळीत सुरूकोल्हापूर विभागातील सहा सहकारी आणि दोन खासगी अशा दहा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत़ सांगली जिल्ह्यातील तीन कारखान्यांचाही समावेश आहे़ तोडी सुरू करून दहा ते पंधरा हजार टन उसाचे गाळप केले आहे़ परंतु, पूर्ण क्षमतेने एकाही कारखान्याचा गळीत हंगाम सुरू नाही़ अनेकांना शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची धास्ती लागून राहिली आहे़संघटनांत मतभेदस्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रति टन २७०० रुपये, तर रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने ३५०० रुपये दराची मागणी केली आहे़ शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने एफआरपीनुसार साखर कारखान्यांनी दर जाहीर करून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे. संघटनांमध्ये ऊस दराबाबत भिन्न मते असल्यामुळे, शेतकऱ्यांत संभ्रम आहे़