शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धुराडी पेटली तरी ऊसतोडी ठप्पच..!

By admin | Updated: November 13, 2014 00:03 IST

टोळ्या दाखल : शनिवारच्या बैठकीकडे लक्ष

सांगली : जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी करून धुराडी पेटविली आहेत़ बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह जत, आटपाडी तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्याही ऊसपट्ट्यात दाखल झाल्या आहेत़ मात्र स्वाभिमानीसह अन्य शेतकरी संघटनांनी दर जाहीर केल्याशिवाय तोडी सुरू करण्यास विरोध दर्शविल्यामुळे तोडी ठप्प आहेत़ दरम्यान, ऊस दर नियंत्रण मंडळाची शनिवार, दि़ १५ रोजी मुंबईत बैठक होत असून याकडे शेतकरी, कारखानदार आणि ऊस तोडणी मजुरांचे लक्ष लागून राहिले आहे़जिल्ह्यातील तासगाव कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार नाही, हे निश्चित आहे़ शिराळा तालुक्यातील निनाईदेवी कारखाना दालमिया कंपनीने घेतला असून त्याचाही गळीत हंगाम सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत़ परंतु, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गळीत हंगाम सुरू करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे़ उर्वरित १६ कारखान्यांनी गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली आहे़ ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या ऊस पट्ट्यात दाखल झाल्या आहेत़ परंतु, दराचा प्रश्न सुटला नसल्यामुळे उसाच्या तोडी कारखान्यांनी अद्याप सुरू केलेल्या नाहीत़ पलूस, जत तालुक्यातील ऊसतोडी काही प्रमाणात सुरू होत्या़ तेथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तोडी बंद पाडल्या. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला गती मिळण्यासाठी ऊस दराचा प्रश्न सुटण्याची नितांत गरज आहे़ येत्या शनिवारी मुंबईत ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक होत आहे़ या बैठकीत कोणता निर्णय होणार, याकडेच शेतकरी, कारखानदार, ऊस तोडणी मजुरांचे लक्ष लागून राहिले आहे़ कोल्हापूर विभागात दहा कारखान्यांचे गळीत सुरूकोल्हापूर विभागातील सहा सहकारी आणि दोन खासगी अशा दहा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत़ सांगली जिल्ह्यातील तीन कारखान्यांचाही समावेश आहे़ तोडी सुरू करून दहा ते पंधरा हजार टन उसाचे गाळप केले आहे़ परंतु, पूर्ण क्षमतेने एकाही कारखान्याचा गळीत हंगाम सुरू नाही़ अनेकांना शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची धास्ती लागून राहिली आहे़संघटनांत मतभेदस्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रति टन २७०० रुपये, तर रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने ३५०० रुपये दराची मागणी केली आहे़ शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने एफआरपीनुसार साखर कारखान्यांनी दर जाहीर करून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे. संघटनांमध्ये ऊस दराबाबत भिन्न मते असल्यामुळे, शेतकऱ्यांत संभ्रम आहे़