शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

‘स्मार्ट सिटी’ इस्लामपूरकरांची परीक्षाच

By admin | Updated: July 22, 2015 23:57 IST

जयंत पाटील यांच्या स्वप्नांचा चुराडा : सत्ताधाऱ्यांच्या आत्मचिंतनाची गरज

अशोक पाटील -इस्लामपूर -आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. या निधीतून झालेल्या निकृष्ट कामांमुळे पाटील यांचे, इस्लामपूरची बारामती करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. आता सत्ताधारी केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्याच्या तयारीला लागले आहेत. परंतु या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जे निकष लागतात, त्याबाबत आत्मचिंतन करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.शहरात घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. गेल्या १0 वर्षात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. चौका-चौकातील कचऱ्याच्या डेपोंचे नियोजनही करता आलेले नाही. शहरात गोळा झालेला कचरा हिळुबाई तळे, राजेबागेस्वारसमोरील मोकळ्या जागेत, पेठ—सांगली रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ टाकला जातो. बहुतांशी प्रभागातील तुंबलेल्या गटारी तक्रारी केल्याशिवाय स्वच्छ केल्या जात नाहीत. गांडूळ खत प्रकल्प कित्येक वर्षे तोट्यात असून तो सध्या बंद अवस्थेत आहे. अजूनही त्याच्या ताळेबंदाचा हिशेब लागलेला नाही. प्रशासकीय खर्च प्रचंड वाढला आहे. तो जवळपास ७0 टक्के आहे. त्यामुळे पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विकासकामे करण्यासाठी निधी शिल्लक नाही. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिले जात नाहीत. पालिकेची २४ बाय ७ पाणी योजना व भुयारी गटार योजना अजूनही कागदोपत्रीच आहे. वीज वितरणच्या शहरातील पथदिव्यांना पर्याय म्हणून सोलर सिस्टिमचा अवलंब करणे गरजेचे होते, पण त्याचाही पत्ता नाही. कऱ्हाड तालुक्यातील मलकापूरसारख्या नगरपंचायतीने या योजना चालू केल्या आहेत. टोल फ्री सेवा, वाय—फाय सिटी, डिजिटल लायब्ररी, प्रशासनाचा संगणकीकृत कारभार या सेवा जाहीर करुनही त्या अस्तित्वात नाहीत. भविष्यातही त्या अस्तित्वात येण्याची शक्यता नाही. इस्लामपूर नगरपालिकेचे शिक्षण मंडळच अस्तित्वात नाही. त्यामुळे जि. प. शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. या शाळांच्या दुरुस्तीकडेही पालिकेचे लक्ष नाही.आघाडी शासनाच्या काळात जयंत पाटील यांनी स्वत:चे वजन वापरुन पालिकेला विविध पुरस्कार मिळवून दिले आहेत. पण आता भाजप सरकारच्या काळात असे फुकटचे पुरस्कार मिळणार नाहीत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पालिकेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला तरी, या परीक्षेत ते कसे उत्तीर्ण होणार, हा संशोधनाचाच विषय ठरणार आहे.नागरी सुविधा कोमात...इस्लामपूर शहरातील आहे त्या पथदिव्यांचा बोजवारा उडाला आहे. मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था आहे, तर उपनगरांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. भुयारी गटार योजना आणि रस्ते कामाचा निधी बँकेत पडून आहे. त्याचे व्याज इतर खर्चासाठी वापरले जात आहे. सार्वजनिक शौचालये, महिलांसाठी वेगळ्या प्रसाधनगृहांचा पत्ताच नाही. निकृष्ट दर्जाच्या घरकुलात वास्तव्यास कोणीही जात नसल्याने तेथील सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गेल्या २५ वर्षात फक्त एकाच बागेचे कौतुक करण्याशिवाय सत्ताधाऱ्यांकडे दुसरे काहीही नाही. आंतरराष्ट्रीय पोहण्याचा तलाव बंद पडला आहे. कोट तलावातील बोटिंग क्लब सलाईनवर आहे. नाट्यगृहाचा आवाज अजूनही कोमात आहे.