शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

धरणग्रस्तांचा ‘करेंगे या मरेंगे’चा नारा

By admin | Updated: August 10, 2015 00:56 IST

चांदोलीत प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा : दहा हजार कोटींच्या निधीची मागणी

वारणावती : येत्या जानेवारी २०१६ अखेर शेतीला कालवे व पोटकालवे निर्मितीसाठी २० हजार कोटी आणि पुनर्वसनासाठी १० हजार कोटींची तरतूद केली नाही, तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. श्रमिक मुक्ती दल, धरण व प्रकल्पग्रस्त आणि लाभक्षेत्रातील शेतकरी ‘करेंगे या मरेंगे’चा एल्गार सुरू करतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. चांदोली (ता. शिराळा) येथे वारणा धरणाचे प्रवेशद्वार येथे धरण व प्रकल्पग्रस्त आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मोर्चासमोर ते बोलत होते. मणदूर येथील हुतात्मा स्मारकामध्ये क्रांतिवीरांना वंदन करून मोर्चास प्रारंभ झाला. मणदूरपासून आंदोलनकर्ते चालत मोर्चाने वारणा धरणाकडे गेले. प्रवेशद्वाराजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्च्यात सुमारे एक हजारावर प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी सहभागी झाले होते. डॉ. पाटणकर म्हणाले, उजनी, कोयना, वर्धा, जायकवाडी, उरमोडी, तारळी, वारणा, दूधगंगा धरणांतून शेतीला पाटाने पाणी मिळाले पाहिजे. १०० टक्के शेती सिंचनाखाली आली पाहिजे. तसेच राज्यातील धरण व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गतिशील पावले उचलली पाहिजेत. हा दुसऱ्या स्वातंत्र्याचा एल्गार असून श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या आराखड्याचा विचार होऊन त्यावर चर्चा झाली पाहिजे. शेतीला नियमित पाणी दिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. हे जमले नाही, तर सरकारला राज्यातील शेतकरी, धरण व प्रकल्पग्रस्त ‘चले जाव’चा इशारा देऊन ‘करेंगे या मरेंगे’चा एल्गार आझाद मैदानावर सुरू करतील. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य दिलीप पाटील, वसंत पाटील, मारुती पाटील, लाभक्षेत्रातील शेतकरी विष्णू पाटील यांची भाषणे झाली. यावेळी पाटबंधारे विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक संग्राम शेवाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘श्रमुद’चे डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील, आनंदा वकटे, संतोष गोटल, शिवाजी पाटील, शिवाजी जाधव, वसंत पाटील आदींनी मोर्चाचे संयोजन केले. (वार्ताहर)घोषणाबाजी...रफिक आत्तार, भागोजी बोडके यांनी चळवळीची गाणी गाऊन मोर्चात रंगत आणली. सकाळी ११ पासून आंदोलनकर्ते ‘सरकार चले जाव, करेंगे या मरेंगे, शेतीला पाटाचे पाणी मिळालेच पाहिजे, शंभर टक्के जमीन देऊन लाभक्षेत्रात पुनर्वसन झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, लाभक्षेत्रातील शेतीला कालवे-पोटकालवे काढून पाणी मिळाले पाहिजे’, अशा घोषणा देत होते.