शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

धरणग्रस्तांचा ‘करेंगे या मरेंगे’चा नारा

By admin | Updated: August 10, 2015 00:56 IST

चांदोलीत प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा : दहा हजार कोटींच्या निधीची मागणी

वारणावती : येत्या जानेवारी २०१६ अखेर शेतीला कालवे व पोटकालवे निर्मितीसाठी २० हजार कोटी आणि पुनर्वसनासाठी १० हजार कोटींची तरतूद केली नाही, तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. श्रमिक मुक्ती दल, धरण व प्रकल्पग्रस्त आणि लाभक्षेत्रातील शेतकरी ‘करेंगे या मरेंगे’चा एल्गार सुरू करतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. चांदोली (ता. शिराळा) येथे वारणा धरणाचे प्रवेशद्वार येथे धरण व प्रकल्पग्रस्त आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मोर्चासमोर ते बोलत होते. मणदूर येथील हुतात्मा स्मारकामध्ये क्रांतिवीरांना वंदन करून मोर्चास प्रारंभ झाला. मणदूरपासून आंदोलनकर्ते चालत मोर्चाने वारणा धरणाकडे गेले. प्रवेशद्वाराजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्च्यात सुमारे एक हजारावर प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी सहभागी झाले होते. डॉ. पाटणकर म्हणाले, उजनी, कोयना, वर्धा, जायकवाडी, उरमोडी, तारळी, वारणा, दूधगंगा धरणांतून शेतीला पाटाने पाणी मिळाले पाहिजे. १०० टक्के शेती सिंचनाखाली आली पाहिजे. तसेच राज्यातील धरण व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गतिशील पावले उचलली पाहिजेत. हा दुसऱ्या स्वातंत्र्याचा एल्गार असून श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या आराखड्याचा विचार होऊन त्यावर चर्चा झाली पाहिजे. शेतीला नियमित पाणी दिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. हे जमले नाही, तर सरकारला राज्यातील शेतकरी, धरण व प्रकल्पग्रस्त ‘चले जाव’चा इशारा देऊन ‘करेंगे या मरेंगे’चा एल्गार आझाद मैदानावर सुरू करतील. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य दिलीप पाटील, वसंत पाटील, मारुती पाटील, लाभक्षेत्रातील शेतकरी विष्णू पाटील यांची भाषणे झाली. यावेळी पाटबंधारे विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक संग्राम शेवाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘श्रमुद’चे डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील, आनंदा वकटे, संतोष गोटल, शिवाजी पाटील, शिवाजी जाधव, वसंत पाटील आदींनी मोर्चाचे संयोजन केले. (वार्ताहर)घोषणाबाजी...रफिक आत्तार, भागोजी बोडके यांनी चळवळीची गाणी गाऊन मोर्चात रंगत आणली. सकाळी ११ पासून आंदोलनकर्ते ‘सरकार चले जाव, करेंगे या मरेंगे, शेतीला पाटाचे पाणी मिळालेच पाहिजे, शंभर टक्के जमीन देऊन लाभक्षेत्रात पुनर्वसन झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, लाभक्षेत्रातील शेतीला कालवे-पोटकालवे काढून पाणी मिळाले पाहिजे’, अशा घोषणा देत होते.