शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सहा तालुक्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा, निम्मा जिल्हा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत मुसळधार पाऊस आणि महापुराने हाहाकार उडवलेला असताना पूर्व भागातील सहा तालुक्यांत मात्र पाऊस बेपत्ता ...

सांगली : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत मुसळधार पाऊस आणि महापुराने हाहाकार उडवलेला असताना पूर्व भागातील सहा तालुक्यांत मात्र पाऊस बेपत्ता आहे. मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुकेच पूरस्थितीत आहेत.

जत, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, आटपाडी व तासगावमध्ये पाऊस गायब झाला आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडीत खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. तेथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही अद्याप रिकामेच आहेत. जतच्या उमदी, संख भागात तर यंदाच्या पावसाळी हंगामात दमदार पाऊस एकदाही झालेला नाही. मिरज तालुक्याचा पश्चिम भाग महापुराला तोंड देत असताना पूर्व भागाला मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्याचा पाऊस खरिपासाठी पुरेसा असला तरी पाणीसाठ्यांसाठी मात्र दमदार पाऊस अपेक्षित आहे. १ जूनपासून जत तालुक्यात ३४७.६ मिमी, तासगावमध्ये ३८१ मिमी, मिरजमध्ये ४६४.५ मिमी, खानापूर, विट्यामध्ये फक्त ३१० मिमी, कवठेमहांकाळमध्ये ३१४, कडेगावमध्ये ४०३.७ मिमी पाऊस झाला आहे. तुलनेने शिराळ्यात तब्बल १,२७० मिमी, वाळव्यात ६२३ मिमी पाऊस झाला आहे. पलूस तालुक्यात आजवर ४९६.९ मिमी पाऊस झाला.

चौकट

परतीच्या पावसावरच भरवसा

जिल्ह्याच्या पूर्व भागाची तहान परतीच्या पावसावरच भागते. पहिल्या टप्प्यातील पाऊस अपवाद वगळता कधीच धो-धो बरसत नसल्याचा या तालुक्यांचा अनुभव आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात महापुराने हाहाकार माजविलेला असताना निम्मा जिल्हा मात्र दृष्काळसदृश स्थितीत असल्याचे विरोधाभासाचे चित्र आहे.