शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

जतला उन्हाच्या तडाख्याने जनावरांचे हाल

By admin | Updated: May 31, 2017 00:18 IST

जतला उन्हाच्या तडाख्याने जनावरांचे हाल

गजानन पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यात उन्हाच्या वाढत्या कडाक्याने दुभती जनावरे धापा टाकू लागली आहेत. उष्माक्षयाच्या झटक्याने दुभत्या म्हैशी, गाय जायबंदी होत आहेत, तर नवजात रेडके अशक्त जन्माला येऊ लागली आहेत. दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. जिवापाड जतन केलेल्या गाभण म्हैशींचे वाढत्या तापमानाने होणारे हाल पाहून पशुमालक धास्तावल्याचे चित्र आहे. पाणी टंचाई आणि चारा टंचाईने दुभती जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे. शेळ्या-मेंढ्यांवरही उन्हाचा परिणाम होत आहे.तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २ लाख २४ हजार ८२४ हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र १ लाख ५२ हजार ७८० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र २३ हजार ३८० हेक्टर आहे. एकूण बागायत क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर, तर जिरायत क्षेत्र ६२ हजार २९९ हेक्टर आहे.खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी हा तालुका प्रसिध्द आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी माणदेशचे वैभव आहे. जातिवंत देखणी, चपळ, काटक, चिवट आणि रोगप्रतिकारक असणारी खिलार जनावरे प्रसिध्द आहेत. तालुक्यात गाई-बैल ८८ हजार ९०५, म्हैशी ६२, १३१, शेळ्या १ लाख ३० हजार ३९५, मेंढ्या ७७ हजार ९७६, कोंबड्या २ लाख ५१ हजार १९० अशी एकूण ६ लाख १० हजार ६०५ जनावरे आहेत. पूर्वी कोरडवाहू जमीन, डोंगराळ भाग, पडीक जमिनीचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांचे पालन करणे सुलभ होते. सध्या तालुक्यात १९७२ पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग तीन वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. ५५ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाई आणि चारा टंचाईने शेतकऱ्यांना दुभती जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे. चारादेखील महाग झाला आहे.साऱ्यात भर पडली आहे ती वाढत्या तापमानाची..! गेल्या महिन्यापासून तालुक्यात सातत्याने ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहिले आहे. वाढत्या तापमानाचा झटका दुभत्या म्हैशी, गाई या जनावरांना जीवघेणा ठरू लागला आहे. तापमान वाढीने अनेक दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. तापमान वाढीने अनेक दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. गावातील दूध संकलन केंद्रातील दूध घटले आहे. त्यामुळे गावात रतीब घालणाऱ्या गवळ्यांची संख्या कमी झाली आहे. दूध डेअरीतून ग्राहकांना ४0 ते ४५ रूपये लिटरने दुधाची विक्री केली जात आहे. पुणे, मुंबईतील दराच्या बरोबरीने दूध विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.गर्भपाताचे मोठे संकटवाढत्या तापमानामुळे शेळ्या-मेंढ्या या लहान जनावरांवर गर्भपाताचे महासंकट उभे राहिले आहे. दिवस न भरताच शेळ्या, मेंढ्यांचा गर्भपात होत आहे. तसेच माजावर न येणे याही घटना घडू लागल्याने, वांझ प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे या घटना होत असताना, पशुसंवर्धन विभाग मात्र, जणू आपण त्या गावचे नसल्यासारखा डोळ्यावर झापड ओढून निवांत आहे. असे दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी पशुपालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, गाभण जनावरांचा वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत किमान गावपातळीवर तरी पशुपालकांच्या प्रबोधनाची मोहीम राबविणे गरजेचे आहे. याकडे पशुसंवर्धन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांत जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.