शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

उद्योजकांसाठी देशात एकच करप्रणाली लागू करावी

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

उद्योजकांच्या अपेक्षा : अर्थसंकल्प २०१४-१५; रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योगांना सतावताहेत अनेक प्रश्न

सांगली, मिरज आणि कुपवाड औद्योगिक वसाहत सध्या पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करीत आहे. सुमारे दहा हजार लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधून पुरवला जात आहे. असे असतानाही स्थानिक संस्थांकडून दुर्लक्ष तर होतच आहे, शिवाय राज्य व केंद्र शासनाकडूनही दुर्लक्ष होत आहे. केंद्रामध्ये नवे सरकार आल्याने उद्योजकांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील म्हणाले की, उद्योजक एलबीटी (स्थानिक संस्था कर)मुळे हैराण झाले आहेत. देशात एकच समान करप्रणाली लागू झाली पाहिजे. सांगली- पेठ रस्ता चौपदरीकरण झाला पाहिजे. मुंबई-कोल्हापूर रेल्वे ट्रॅक दुहेरी झाला पाहिजे. या परिसरात पंचतारांकित उद्योग आल्याशिवाय या परिसराचा विकास होणार नाही. तो आणण्यासाठी केंद्रानेच प्रयत्न केले पाहिजेत. उमेद ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे मालक, उद्योजक सतीश मालू म्हणाले की, व्हॅट, एलबीटी आदी करातून उद्योजकांची मुक्तता करुन जीएसटी कर लागू झाला पाहिजे. संपूर्ण देशभरात वेगवेगळे कर लावून उद्योजकांना असमान सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजेत. निर्यातीला चालना देण्यासाठी पॅकेज दिले पाहिजे. उद्योजक हा रोजगार देतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. उद्योजक सागर पाटील म्हणाले की, उद्योजकांना पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. यामध्ये वीज, पाणी व रस्त्यांचा समावेश आहे. वीज, पाणी बिलात सूट दिली पाहिजे. महागड्या विजेमुळेच उद्योजकांचे कंबरडे मोडले पाहिजे. सोयीच्या दरात वीज उपलब्ध झाल्यास किंवा त्याला अनुदान मिळाल्यास उद्योजकांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)