शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांसाठी देशात एकच करप्रणाली लागू करावी

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

उद्योजकांच्या अपेक्षा : अर्थसंकल्प २०१४-१५; रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योगांना सतावताहेत अनेक प्रश्न

सांगली, मिरज आणि कुपवाड औद्योगिक वसाहत सध्या पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करीत आहे. सुमारे दहा हजार लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधून पुरवला जात आहे. असे असतानाही स्थानिक संस्थांकडून दुर्लक्ष तर होतच आहे, शिवाय राज्य व केंद्र शासनाकडूनही दुर्लक्ष होत आहे. केंद्रामध्ये नवे सरकार आल्याने उद्योजकांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील म्हणाले की, उद्योजक एलबीटी (स्थानिक संस्था कर)मुळे हैराण झाले आहेत. देशात एकच समान करप्रणाली लागू झाली पाहिजे. सांगली- पेठ रस्ता चौपदरीकरण झाला पाहिजे. मुंबई-कोल्हापूर रेल्वे ट्रॅक दुहेरी झाला पाहिजे. या परिसरात पंचतारांकित उद्योग आल्याशिवाय या परिसराचा विकास होणार नाही. तो आणण्यासाठी केंद्रानेच प्रयत्न केले पाहिजेत. उमेद ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे मालक, उद्योजक सतीश मालू म्हणाले की, व्हॅट, एलबीटी आदी करातून उद्योजकांची मुक्तता करुन जीएसटी कर लागू झाला पाहिजे. संपूर्ण देशभरात वेगवेगळे कर लावून उद्योजकांना असमान सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजेत. निर्यातीला चालना देण्यासाठी पॅकेज दिले पाहिजे. उद्योजक हा रोजगार देतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. उद्योजक सागर पाटील म्हणाले की, उद्योजकांना पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. यामध्ये वीज, पाणी व रस्त्यांचा समावेश आहे. वीज, पाणी बिलात सूट दिली पाहिजे. महागड्या विजेमुळेच उद्योजकांचे कंबरडे मोडले पाहिजे. सोयीच्या दरात वीज उपलब्ध झाल्यास किंवा त्याला अनुदान मिळाल्यास उद्योजकांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)