शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विश्वासघातक्यांना जागा दाखवा

By admin | Updated: February 16, 2017 23:14 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : पिंपोडे बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा; शासनाने जगणे अवघड केले

 

वाठार स्टेशन : ‘सध्याच्या शासनाने सर्वसामान्यांचे जगणे अवघड करुन टाकले आहे. अशावेळी सत्तेच्या लालसेपोटी विश्वासघात करणाऱ्यांना जागा दाखवून द्यावी,’ असे आवाहन राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथे पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मंगेश धुमाळ, पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार संजय साळुंखे, देऊर पंचायत समिती गणाच्या उमेदवार साधना बनकर, बाळासाहेब सोळस्कर, सभापती अजय कदम, सभापती शहाजी भोईटे, जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, सुरेशराव साळुंखे, विकास साळुंखे, नागेश जाधव, राजूकाका भोसले, शाहूराज फाळके, नीलेश जगदाळे, ललित मुळीक, अजित भोईटे, संभाजीराव धुमाळ, दत्तात्रय धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘आत्ताच्या सरकारने अडीच वर्षांत सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्कील केले आहे. नोटाबंदीच्या परिणामाने अनेक उद्योग बंद पडले, अनेक तरुण बेरोजगार झाले तर शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला दर नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता दबली आहे. शहरी भागात मतदार संघ वाढले आहेत. यामुळे या सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत शहरी मतदारांना खूश करण्याची भूमिका घेतली आहे. मुळात या शासनाला शेतकरी नको तर व्यापारी जगवायचा आहे.,’ असे आवाहन त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब सोळस्कर म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सध्याच्या कोणत्याच राजकीय पक्षात विकासाची दिशा नाही. सध्याचे भाजप-सेना सरकार हे शेतकरी विरोधी आहे.’ (वार्ताहर)