शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘शॉर्ट मार्जिन’मुळे कारखानदार एकत्र सांगली जिल्हा बँकेत आज बैठक : कर्जाबाबत होणार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:10 IST

साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले आहेत. दोन महिन्यांपासून उसाच्या पहिल्या हप्त्याचे सुमारे २०० कोटी थकले आहेत.

सांगली : साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले आहेत. दोन महिन्यांपासून उसाच्या पहिल्या हप्त्याचे सुमारे २०० कोटी थकले आहेत. याशिवाय कारखान्यांच्या पूर्वहंगामी कर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील कारखानदारांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सांगितले. कारखान्यांच्या मागण्या ऐकून घेऊन शासनाकडे बँकही पाठपुरावा करणार आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. सोळा कारखान्यांनी ९० लाख टन उसाचे गाळप करीत ९८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हंगाम सुरू झाल्यापासून साखरेचे दर कोसळत राहिले. परिणामी राज्य शिखर बँकेकडून साखरेचे मूल्यांकन कमी करण्यात आले. बँकांकडून पैसे उपलब्ध होत नसल्याने एफआरपी देतानाही कसरत करावी लागत आहे.

जाहीर केलेला दर कारखान्यांना देता आलेला नाही. साखरेचे दर पडल्याने उसाला प्रतिटन २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीएवढी किंवा त्यापेक्षाही जादा रक्कम पहिल्या हप्त्यापोटी देऊ, असे सांगितले होते, त्या कारखान्यांनीही साखरेचे दर खाली येताच एफआरपीची रक्कम देण्यातही हात आखडते घेतले आहेत.

आॅक्टोबरपासून नवीन गाळप हंगाम सुरु होणार आहे. कारखान्यांना पूर्वहंगामी कर्ज देणे गरजेचे आहे. परंतु कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये सापडले असल्याने बँकेलाही अडचणीचे झाले आहे.राज्य बँकेकडून कर्जाबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांची आज बैठक बोलाविली आहे. पूर्वहंगामी कर्जाबाबत अडचणी निर्माण होत आहेत. त्याबाबत चर्चा केली जाईल. कारखान्यांचे प्रश्न आणि साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, परंतु साखर कारखानदारीबाबत शासनाकडून उदासीनता असल्याचे दिसून येते, असा आरोपही पाटील यांनी केला.ऊस उत्पादक अडचणीतमार्चपासून कारखाने बंद होईपर्यंत जिल्ह्यात सुमारे १२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून या उसाची ३०० कोटी रुपयांची ऊस बिले थांबली आहेत. कमी दरामुळे साखर कारखानेही साखर विकण्याची घाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादकांची परिस्थिती अवघड बनली आहे. साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता होऊनही पहिला हप्ताच न मिळाल्याने बँका तसेच सोसायट्यांच्या कर्जाची फिरवा-फिरवी झालेली नाही. परिणामी शेतकरी वर्गही अडचणीत आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने