शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

‘शॉर्ट मार्जिन’मुळे कारखानदार एकत्र सांगली जिल्हा बँकेत आज बैठक : कर्जाबाबत होणार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:10 IST

साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले आहेत. दोन महिन्यांपासून उसाच्या पहिल्या हप्त्याचे सुमारे २०० कोटी थकले आहेत.

सांगली : साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले आहेत. दोन महिन्यांपासून उसाच्या पहिल्या हप्त्याचे सुमारे २०० कोटी थकले आहेत. याशिवाय कारखान्यांच्या पूर्वहंगामी कर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील कारखानदारांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सांगितले. कारखान्यांच्या मागण्या ऐकून घेऊन शासनाकडे बँकही पाठपुरावा करणार आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. सोळा कारखान्यांनी ९० लाख टन उसाचे गाळप करीत ९८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हंगाम सुरू झाल्यापासून साखरेचे दर कोसळत राहिले. परिणामी राज्य शिखर बँकेकडून साखरेचे मूल्यांकन कमी करण्यात आले. बँकांकडून पैसे उपलब्ध होत नसल्याने एफआरपी देतानाही कसरत करावी लागत आहे.

जाहीर केलेला दर कारखान्यांना देता आलेला नाही. साखरेचे दर पडल्याने उसाला प्रतिटन २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीएवढी किंवा त्यापेक्षाही जादा रक्कम पहिल्या हप्त्यापोटी देऊ, असे सांगितले होते, त्या कारखान्यांनीही साखरेचे दर खाली येताच एफआरपीची रक्कम देण्यातही हात आखडते घेतले आहेत.

आॅक्टोबरपासून नवीन गाळप हंगाम सुरु होणार आहे. कारखान्यांना पूर्वहंगामी कर्ज देणे गरजेचे आहे. परंतु कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये सापडले असल्याने बँकेलाही अडचणीचे झाले आहे.राज्य बँकेकडून कर्जाबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांची आज बैठक बोलाविली आहे. पूर्वहंगामी कर्जाबाबत अडचणी निर्माण होत आहेत. त्याबाबत चर्चा केली जाईल. कारखान्यांचे प्रश्न आणि साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, परंतु साखर कारखानदारीबाबत शासनाकडून उदासीनता असल्याचे दिसून येते, असा आरोपही पाटील यांनी केला.ऊस उत्पादक अडचणीतमार्चपासून कारखाने बंद होईपर्यंत जिल्ह्यात सुमारे १२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून या उसाची ३०० कोटी रुपयांची ऊस बिले थांबली आहेत. कमी दरामुळे साखर कारखानेही साखर विकण्याची घाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादकांची परिस्थिती अवघड बनली आहे. साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता होऊनही पहिला हप्ताच न मिळाल्याने बँका तसेच सोसायट्यांच्या कर्जाची फिरवा-फिरवी झालेली नाही. परिणामी शेतकरी वर्गही अडचणीत आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने