शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची आमच्या मांडीला मांडी कशासाठी?, संजय राऊत यांना कवडीचीही किंमत नाही : मधू चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 11:26 IST

भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा प्रामाणिक हेतू आहे, मात्र शिवसेनेलाच विरोधी भाषा बोलायची आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा मीसुद्धा निषेध करतो, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या लेखिका व पत्रकार होत्या. हिंदू देव-देवतांची त्यांनी टिंगल टवाळी केली, असे चव्हाण म्हणाले.

ठळक मुद्देसंजय राऊत यांना कवडीचीही किंमत नाहीगौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या पत्रकारधोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळेशासनाने राबविलेली धोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळे

सांगली ,दि.  ०६ : भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले की, राज्य सरकाने अत्यंत चांगले काम गेल्या तीन वर्षात केले आहे. आकडेवारीनिशी आम्ही या बाबी स्पष्ट करू शकतो. विरोधक केवळ ढोंगीपणाचे दर्शन घडवित आहेत. आकडेवारीच्या पातळीवर त्यांनी आमच्याशी समोरासमोर युक्तिवाद करावा. आम्ही त्यासाठी तयार आहोत. शिवसेनाही विरोधकाची भाषा बोलत असेल तर ते जनतेला पटणार नाही.

सरकारविरोधातच बोलायचे असेल तर सत्तेत शिवसेना आमच्या मांडीला मांडी लावून का बसत आहे. आम्ही शिवसेनेची भूमिका म्हणून केवळ उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांशी प्रामाणिक असलेल्या सच्च शिवसैनिकांनाच मानतो. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा प्रामाणिक हेतू आहे, मात्र शिवसेनेलाच विरोधी भाषा बोलायची आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने जो काही आक्रोश सध्या सुरू केला आहे, तो त्यांचा व्यक्तिगत आक्रोश आहे. नोटाबंदीच्या काळात दोनशे व्यक्ति मृत झाल्या त्याचे आम्हालाही वाईट वाटते आता त्यांचे सुतकही संपल्यानंतर वर्षभर श्राद्ध घालण्याचे काम हीच मंडळी करीत आहेत.

आक्रोश त्याचवेळी करायला हवा होता, मात्र त्यांनी राजकीय सोयीचा कालावधि शोधला. वास्तविक या लोकांचा काळा पैसा नष्ट झाल्याने त्यांचा संताप व्यक्त होत आहे. सामान्य लोकांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. सामान्य जनतेला सरकारचे चांगले हेतू समजल्यामुळेच निवडणुकांमध्ये लोक आमच्या बाजुने कौल देताना दिसत आहेत.

सिंचन, शिक्षण, बांधकाम, रस्ते अन्य पायाभूत सुविधा, योजना, वैद्यकीय सुविधा, खात्यावरील थेट अनुदान अशा अनेक स्तरावर सरकारने केलेल्या कामांचे परिणाम आकडेवारीतून दिसत आहेत. माझ्याकडे या सर्व गोष्टींचे आकडे आहेत. त्यामुळे वास्तवदर्शी आकडेवारीवर कोणाशीही सामना करायची माझी तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले.

गौरी लंकेश घाणेरडी पत्रकारगौरी लंकेश यांच्या हत्येचा मीसुद्धा निषेध करतो, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या लेखिका व पत्रकार होत्या. हिंदू देव-देवतांची त्यांनी टिंगल टवाळी केली. सरकारवर अत्यंत घाणेरडे लेखन केले. त्यामुळे त्याबाबतीत आम्ही त्यांचे समर्थन कधीच करणार नाही. ज्यांनी हत्या केली त्यांना जरून पकडण्यात यावे, अशी आमची मागणी असेल, असे चव्हाण म्हणाले.धोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळेशासनाने राबविलेली सर्व धोरणे चांगली आहेत, मात्र त्याच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. प्रशासकीय स्तरावर अधिकारी आणि अन्य निमशासकीय संस्थांकडून गाफिलपणा झालेला आहे. या तांत्रिक चूका आहेत, असे चव्हाण म्हणाले.बहु झाले बुद्धिमान, म्हणून घोळराज्यात निर्माण होत असलेल्या अडचणींना बहु झाले बुद्धिमान हेच मुख्य कारण आहे. समजुतदार लोकांची संख्या कमी झाल्यामुळे हे घडत असल्याचे चव्हाण म्हणाले.चव्हाणांनी दिलेली आकडेवारी

  1. महाराष्ट्रात यावर्षी १ लाख २९ हाजारल ३४0 कोटींची गुंतवणूक झाली
  2. शिक्षेचा दर आघाडी सरकारच्या काळात ८ टक्के होता, तो भाजप काळात ४७ टक्के झाला
  3. देशाचा विकास दर अमेरिका, जपान, इंग्लंड, चीन यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक.
  4. नोटाबंदीनंतर १६ हजार कोटींचा काळा पैसा नष्ट
  5. ८0 कोटींच्या बेनामी मालमत्ता सापडल्या.
  6. आघाडी सरकारच्या काळात उणे असलेला कृषी विकास दर भाजपच्या काळात १२.५ टक्के झाला.
  7. राज्यातील ११ हजार ४९४ गावे दुष्काळमुक्त झाली.

 

 

प्रवेश घटल्याने पतंगरावांचा संतापपतंगराव कदम सध्या भारती विद्यापीठामुळे अडचणीत आले आहेत. शंभर टक्क्यांवरून त्यांचे प्रवेश आता १५ टक्क्यांपर्यंत घटल्याने ते या गोष्टीचा संताप सरकारवर व्यक्त करीत आहेत, अशी टीका मधू चव्हाण यांनी केली.अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे बेछुटपणा नव्हेलोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर काहीही व्यक्त करीत आहेत. अभिव्यक्तीच्या नावावर बेछुटपणा खपवून घेतला जाणार नाही. आम्ही विरोधी नेत्यांवर टीका करताना भान ठेवतो, तसा ते ठेवत नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण