शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

शिवसेनेची आमच्या मांडीला मांडी कशासाठी?, संजय राऊत यांना कवडीचीही किंमत नाही : मधू चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 11:26 IST

भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा प्रामाणिक हेतू आहे, मात्र शिवसेनेलाच विरोधी भाषा बोलायची आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा मीसुद्धा निषेध करतो, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या लेखिका व पत्रकार होत्या. हिंदू देव-देवतांची त्यांनी टिंगल टवाळी केली, असे चव्हाण म्हणाले.

ठळक मुद्देसंजय राऊत यांना कवडीचीही किंमत नाहीगौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या पत्रकारधोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळेशासनाने राबविलेली धोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळे

सांगली ,दि.  ०६ : भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले की, राज्य सरकाने अत्यंत चांगले काम गेल्या तीन वर्षात केले आहे. आकडेवारीनिशी आम्ही या बाबी स्पष्ट करू शकतो. विरोधक केवळ ढोंगीपणाचे दर्शन घडवित आहेत. आकडेवारीच्या पातळीवर त्यांनी आमच्याशी समोरासमोर युक्तिवाद करावा. आम्ही त्यासाठी तयार आहोत. शिवसेनाही विरोधकाची भाषा बोलत असेल तर ते जनतेला पटणार नाही.

सरकारविरोधातच बोलायचे असेल तर सत्तेत शिवसेना आमच्या मांडीला मांडी लावून का बसत आहे. आम्ही शिवसेनेची भूमिका म्हणून केवळ उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांशी प्रामाणिक असलेल्या सच्च शिवसैनिकांनाच मानतो. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा प्रामाणिक हेतू आहे, मात्र शिवसेनेलाच विरोधी भाषा बोलायची आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने जो काही आक्रोश सध्या सुरू केला आहे, तो त्यांचा व्यक्तिगत आक्रोश आहे. नोटाबंदीच्या काळात दोनशे व्यक्ति मृत झाल्या त्याचे आम्हालाही वाईट वाटते आता त्यांचे सुतकही संपल्यानंतर वर्षभर श्राद्ध घालण्याचे काम हीच मंडळी करीत आहेत.

आक्रोश त्याचवेळी करायला हवा होता, मात्र त्यांनी राजकीय सोयीचा कालावधि शोधला. वास्तविक या लोकांचा काळा पैसा नष्ट झाल्याने त्यांचा संताप व्यक्त होत आहे. सामान्य लोकांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. सामान्य जनतेला सरकारचे चांगले हेतू समजल्यामुळेच निवडणुकांमध्ये लोक आमच्या बाजुने कौल देताना दिसत आहेत.

सिंचन, शिक्षण, बांधकाम, रस्ते अन्य पायाभूत सुविधा, योजना, वैद्यकीय सुविधा, खात्यावरील थेट अनुदान अशा अनेक स्तरावर सरकारने केलेल्या कामांचे परिणाम आकडेवारीतून दिसत आहेत. माझ्याकडे या सर्व गोष्टींचे आकडे आहेत. त्यामुळे वास्तवदर्शी आकडेवारीवर कोणाशीही सामना करायची माझी तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले.

गौरी लंकेश घाणेरडी पत्रकारगौरी लंकेश यांच्या हत्येचा मीसुद्धा निषेध करतो, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या लेखिका व पत्रकार होत्या. हिंदू देव-देवतांची त्यांनी टिंगल टवाळी केली. सरकारवर अत्यंत घाणेरडे लेखन केले. त्यामुळे त्याबाबतीत आम्ही त्यांचे समर्थन कधीच करणार नाही. ज्यांनी हत्या केली त्यांना जरून पकडण्यात यावे, अशी आमची मागणी असेल, असे चव्हाण म्हणाले.धोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळेशासनाने राबविलेली सर्व धोरणे चांगली आहेत, मात्र त्याच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. प्रशासकीय स्तरावर अधिकारी आणि अन्य निमशासकीय संस्थांकडून गाफिलपणा झालेला आहे. या तांत्रिक चूका आहेत, असे चव्हाण म्हणाले.बहु झाले बुद्धिमान, म्हणून घोळराज्यात निर्माण होत असलेल्या अडचणींना बहु झाले बुद्धिमान हेच मुख्य कारण आहे. समजुतदार लोकांची संख्या कमी झाल्यामुळे हे घडत असल्याचे चव्हाण म्हणाले.चव्हाणांनी दिलेली आकडेवारी

  1. महाराष्ट्रात यावर्षी १ लाख २९ हाजारल ३४0 कोटींची गुंतवणूक झाली
  2. शिक्षेचा दर आघाडी सरकारच्या काळात ८ टक्के होता, तो भाजप काळात ४७ टक्के झाला
  3. देशाचा विकास दर अमेरिका, जपान, इंग्लंड, चीन यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक.
  4. नोटाबंदीनंतर १६ हजार कोटींचा काळा पैसा नष्ट
  5. ८0 कोटींच्या बेनामी मालमत्ता सापडल्या.
  6. आघाडी सरकारच्या काळात उणे असलेला कृषी विकास दर भाजपच्या काळात १२.५ टक्के झाला.
  7. राज्यातील ११ हजार ४९४ गावे दुष्काळमुक्त झाली.

 

 

प्रवेश घटल्याने पतंगरावांचा संतापपतंगराव कदम सध्या भारती विद्यापीठामुळे अडचणीत आले आहेत. शंभर टक्क्यांवरून त्यांचे प्रवेश आता १५ टक्क्यांपर्यंत घटल्याने ते या गोष्टीचा संताप सरकारवर व्यक्त करीत आहेत, अशी टीका मधू चव्हाण यांनी केली.अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे बेछुटपणा नव्हेलोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर काहीही व्यक्त करीत आहेत. अभिव्यक्तीच्या नावावर बेछुटपणा खपवून घेतला जाणार नाही. आम्ही विरोधी नेत्यांवर टीका करताना भान ठेवतो, तसा ते ठेवत नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण