शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

शिराळ्यात उमेदवारीचा तिढा सुटणार? राजकीय समीकरणांविषयी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:02 IST

शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे

ठळक मुद्देमतदारसंघात उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू

अशोक पाटील ।इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांचीही भर पडली आहे. येथील राजकीय समीकरणे बदलत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले. आता सर्वच पक्ष सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी उभे राहतील आणि उर्वरित सव्वा वर्षासाठी देशमुख यांना विधानपरिषदेवर संधी देतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचाही तिढा सुटणार आहे.

सांगली जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम या नेत्यांनी काँग्रेस रुजवली. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी असा प्रवास करून इस्लामपूर मतदार संघाबरोबर जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम केली. पतंगराव कदम यांनीही ताकदीने काँग्रेस रुजवली. त्याचेच फलित म्हणजे आमदार मोहनराव कदम आणि आमदार विश्वजित कदम राजकीय पटलावर कार्यरत आहेत.

वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या वादाचे राजकारण आजही धुमसत आहे. याचा फायदा मोदी लाटेत भाजपला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना झाला आणि भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. सांगलीत भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून वसंतदादा घराण्याला म्हणजेच काँग्रेसला धक्का बसला. विटा-खानापूर मतदार संघातही आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण पेलून सदाशिव पाटील यांची मक्तेदारी मोडून काढली. त्यांनतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपला यशही मिळाले.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाताहत होत असतानाच, आर. आर. पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम यांच्यासारखे खंदे आणि ज्येष्ठ नेतृत्व हरपले. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी जिल्ह्यात पोरकी झाली. या आघाडी काँग्रेसला उभारी येण्यासाठी राष्ट्रवादीतून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील, काँग्रेसमधून मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना राजकीय वारसदार ठरवताना कोणतेही अडसर निर्माण झाले नाहीत.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तीन खंदे नेतृत्व हरपले असताना, डोंगरी भागाशी निगडित असलेल्या शिराळा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व आमदार शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला एकनिष्ठेने जपले. गेली १० वर्षे शरीर साथ देत नसतानाही डोंगरी भागाशी सततचा संपर्क आणि विकासाचा ध्यास ठेवत अखेरच्या श्वासापर्यंत शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसचा वसा जपला. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकत्र येऊन सत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेवर घेऊन डोंगरी भागातील नेतृत्व अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा सामान्यांतून उमटत आहे. त्यामुळे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचा तिढाही आपसूकच सुटणार आहे.नवी राजकीय समीकरणेसत्यजित देशमुख यांना विधानपरिषद मिळाली, तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटेल. परंतु दुसरीकडे आमदार शिवाजीराव नाईक यांना शिराळा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघात पेठनाक्यावरील महाडिक गटाचा सवतासुभा नवी राजकीय समीकरणे घडविण्याच्या इराद्याने संपर्क ठेवून आहे. त्यामुळे आमदार शिवाजीराव नाईक आणि महाडिक गटातील दुरावा कोणाच्या पथ्यावर पडणार, यावर शिराळा मतदारसंघात ऐन थंडीत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली