शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात उमेदवारीचा तिढा सुटणार? राजकीय समीकरणांविषयी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:02 IST

शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे

ठळक मुद्देमतदारसंघात उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू

अशोक पाटील ।इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांचीही भर पडली आहे. येथील राजकीय समीकरणे बदलत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले. आता सर्वच पक्ष सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी उभे राहतील आणि उर्वरित सव्वा वर्षासाठी देशमुख यांना विधानपरिषदेवर संधी देतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचाही तिढा सुटणार आहे.

सांगली जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम या नेत्यांनी काँग्रेस रुजवली. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी असा प्रवास करून इस्लामपूर मतदार संघाबरोबर जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम केली. पतंगराव कदम यांनीही ताकदीने काँग्रेस रुजवली. त्याचेच फलित म्हणजे आमदार मोहनराव कदम आणि आमदार विश्वजित कदम राजकीय पटलावर कार्यरत आहेत.

वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या वादाचे राजकारण आजही धुमसत आहे. याचा फायदा मोदी लाटेत भाजपला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना झाला आणि भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. सांगलीत भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून वसंतदादा घराण्याला म्हणजेच काँग्रेसला धक्का बसला. विटा-खानापूर मतदार संघातही आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण पेलून सदाशिव पाटील यांची मक्तेदारी मोडून काढली. त्यांनतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपला यशही मिळाले.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाताहत होत असतानाच, आर. आर. पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम यांच्यासारखे खंदे आणि ज्येष्ठ नेतृत्व हरपले. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी जिल्ह्यात पोरकी झाली. या आघाडी काँग्रेसला उभारी येण्यासाठी राष्ट्रवादीतून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील, काँग्रेसमधून मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना राजकीय वारसदार ठरवताना कोणतेही अडसर निर्माण झाले नाहीत.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तीन खंदे नेतृत्व हरपले असताना, डोंगरी भागाशी निगडित असलेल्या शिराळा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व आमदार शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला एकनिष्ठेने जपले. गेली १० वर्षे शरीर साथ देत नसतानाही डोंगरी भागाशी सततचा संपर्क आणि विकासाचा ध्यास ठेवत अखेरच्या श्वासापर्यंत शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसचा वसा जपला. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकत्र येऊन सत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेवर घेऊन डोंगरी भागातील नेतृत्व अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा सामान्यांतून उमटत आहे. त्यामुळे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचा तिढाही आपसूकच सुटणार आहे.नवी राजकीय समीकरणेसत्यजित देशमुख यांना विधानपरिषद मिळाली, तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटेल. परंतु दुसरीकडे आमदार शिवाजीराव नाईक यांना शिराळा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघात पेठनाक्यावरील महाडिक गटाचा सवतासुभा नवी राजकीय समीकरणे घडविण्याच्या इराद्याने संपर्क ठेवून आहे. त्यामुळे आमदार शिवाजीराव नाईक आणि महाडिक गटातील दुरावा कोणाच्या पथ्यावर पडणार, यावर शिराळा मतदारसंघात ऐन थंडीत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली