शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

शिराळ्यात उमेदवारीचा तिढा सुटणार? राजकीय समीकरणांविषयी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:02 IST

शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे

ठळक मुद्देमतदारसंघात उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू

अशोक पाटील ।इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांचीही भर पडली आहे. येथील राजकीय समीकरणे बदलत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले. आता सर्वच पक्ष सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी उभे राहतील आणि उर्वरित सव्वा वर्षासाठी देशमुख यांना विधानपरिषदेवर संधी देतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचाही तिढा सुटणार आहे.

सांगली जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम या नेत्यांनी काँग्रेस रुजवली. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी असा प्रवास करून इस्लामपूर मतदार संघाबरोबर जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम केली. पतंगराव कदम यांनीही ताकदीने काँग्रेस रुजवली. त्याचेच फलित म्हणजे आमदार मोहनराव कदम आणि आमदार विश्वजित कदम राजकीय पटलावर कार्यरत आहेत.

वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या वादाचे राजकारण आजही धुमसत आहे. याचा फायदा मोदी लाटेत भाजपला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना झाला आणि भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. सांगलीत भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून वसंतदादा घराण्याला म्हणजेच काँग्रेसला धक्का बसला. विटा-खानापूर मतदार संघातही आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण पेलून सदाशिव पाटील यांची मक्तेदारी मोडून काढली. त्यांनतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपला यशही मिळाले.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाताहत होत असतानाच, आर. आर. पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम यांच्यासारखे खंदे आणि ज्येष्ठ नेतृत्व हरपले. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी जिल्ह्यात पोरकी झाली. या आघाडी काँग्रेसला उभारी येण्यासाठी राष्ट्रवादीतून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील, काँग्रेसमधून मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना राजकीय वारसदार ठरवताना कोणतेही अडसर निर्माण झाले नाहीत.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तीन खंदे नेतृत्व हरपले असताना, डोंगरी भागाशी निगडित असलेल्या शिराळा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व आमदार शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला एकनिष्ठेने जपले. गेली १० वर्षे शरीर साथ देत नसतानाही डोंगरी भागाशी सततचा संपर्क आणि विकासाचा ध्यास ठेवत अखेरच्या श्वासापर्यंत शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसचा वसा जपला. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकत्र येऊन सत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेवर घेऊन डोंगरी भागातील नेतृत्व अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा सामान्यांतून उमटत आहे. त्यामुळे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचा तिढाही आपसूकच सुटणार आहे.नवी राजकीय समीकरणेसत्यजित देशमुख यांना विधानपरिषद मिळाली, तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटेल. परंतु दुसरीकडे आमदार शिवाजीराव नाईक यांना शिराळा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघात पेठनाक्यावरील महाडिक गटाचा सवतासुभा नवी राजकीय समीकरणे घडविण्याच्या इराद्याने संपर्क ठेवून आहे. त्यामुळे आमदार शिवाजीराव नाईक आणि महाडिक गटातील दुरावा कोणाच्या पथ्यावर पडणार, यावर शिराळा मतदारसंघात ऐन थंडीत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली