शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

शिराळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

By admin | Updated: October 1, 2015 22:49 IST

मानसिंगराव नाईक : तहसील कार्यालयावर मोर्चा, कर्जे माफ करण्यासह विविध मागण्या

शिराळा : शिराळा तालुक्यात यावर्षी पाऊस न झाल्याने भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे हा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत. तसेच दुष्काळाचे सर्व निकष लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी गुरुवारी दिला.आमदार शिवाजीराव नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी ‘होय, वाकुर्डे योजना पूर्ण करणे येड्यागबाळ्याचे काम नव्हे, कारण पंधरा वर्षे तुम्ही आमदार असताना ही योजना पूर्ण करू शकला नाही. योजना पूर्ण करण्यासाठी अंगात पाणी पाहिजे. नुसत्या मोठ्या गप्पा मारुन चालत नाही’, असा टोलाही लगावला.शिराळा येथील तहसील कार्यालयावर शिराळा तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अंबामाता मंदिरापासून या मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा मुख्य रस्ता, सोमवार पेठ, गुरुवार पेठ, एस. टी. बसस्थानक मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसीलदार विजय पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.तेथे माजी आमदार नाईक म्हणाले, तालुक्यात १९७२ पेक्षा भयानक परिस्थिती आहे. पाऊस नसल्याने धरणे, तलाव पूर्ण भरलेले नाहीत. पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. शेतकऱ्यांची पिके वाया जाऊ लागली आहेत. पशुधन कसे वाचवायचे, हा प्रश्नही गंभीर होत आहे. शेतातील पिके वाळली आहेत. त्यामुळे ती पिके काढण्यासाठी खर्च नको म्हणून शेतकरी शेतीकडेही फिरकत नाही. शासनाने याचा गंभीरपणे विचार करावा. पीक आणेवारी ३३ टक्के करावी.शिवाजीराव नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना नाईक म्हणाले की, तालुक्यात २२ कोटींचा गिरजवडे प्रकल्प मंजूर केला. त्याचे कामही वेगात सुरू होते. मात्र विद्यमान आमदारांनी श्रेयवादासाठी या प्रकल्पाचा निधी अडवून हे काम बंद पाडले आहे. सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभेत तुमच्या संस्थेबद्दल बोला, तुम्ही किती ऊस दर जाहीर केला, ते सांगा. तुम्ही शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन ऊस दरासाठी आंदोलन केले आहे, पण तुमच्या ऊसदराचे काय केले, ते बोला! वाकुर्डे योजनेचे तुम्ही पंधरा वर्षांत काय केले? किती निधी आणला? मी पाच वर्षात १२५ कोटींचा निधी आणून ही योजना मार्गी लावली. तुमच्यासारख्या येड्यागबाळ्याचे ही योजना पूर्ण करण्याचे काम नाही. यावेळी डॉ. धनंजय माने, राष्ट्रवादीचे तालुक्याध्यक्ष विजयराव नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सम्राटसिंह नाईक, माजी सभापती अ‍ॅड. भगतसिंह नाईक, शिवाजीराव घोडे-पाटील, दिनकरराव पाटील, रणजितसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, शंकरराव चरापले, विलासराव पाटील, विराज नाईक, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेशराव चव्हाण, विश्वास कदम उपस्थित होते. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)आंदोलकांच्या मागण्यावाकुर्डे योजनेतून येणाऱ्या पाण्याचा वापर करून उत्तर भागातील सर्व धरणे, तलाव भरुन घ्यावेत.रब्बी हंगामासाठी ५० टक्के सवलतीच्या दरात बियाणे, खते उपलब्ध व्हावे.वाकुर्डे योजनेसाठी ५४२.१९ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा.८० मीटरच्या उपसा सिंचन योजना शासकीय खर्चाने पूर्ण कराव्यात.गिरजवडे प्रकल्पाचे थांबलेले काम त्वरित चालू करावे.शेती पंपाची वीज बिले माफ करावीत.पीक कर्जे माफ करावीत. पाणीपट्टी माफ करावी.