शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच शेट्टींची माझ्यावर टीका- सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 18:33 IST

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी माझा जप सुरू केला आहे.

इस्लामपूर, दि. 20 - प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी माझा जप सुरू केला आहे. संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी त्यांचामार्ग स्वीकारावा, मी माझ्या मार्गाने जाईन. शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नांचा त्यांचा अभ्यास मोठा आहे. त्यामुळे केंद्राला आणि राज्यालात्यांनी सूचना कराव्यात. आम्ही त्या स्वीकारू, असा उपहासात्मक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना लगावला. इस्लामपूर येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. खा. शेट्टी आणि मंत्री खोत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.एकमेकांच्या भानगडी उघड करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. मंत्री सददाभाऊ खोत म्हणाले, भविष्यात शेट्टी यांनी माझ्यावर कितीही टीकाकेली तरी त्याची मी दखल घेणार नाही किंवा त्याला प्रत्युत्तरही देणार नाही. माझ्या हकालपट्टीचा निर्णय घेणाºया समितीमध्ये असलेल्यासदस्यांपेक्षा शेतकरी चळवळीत मी आणि शेट्टींनी जास्त काळ काम केले आहे. अशी परिस्थिती असतानाही त्यांनी माझ्यावर कार्यवाही केली आहे.रघुनाथदादांना शेतकरी चळवळीतून खड्यासारखे बाजूला करण्याचे काम शेट्टी यांनी केले आहे. आता ही वेळ त्यांनी माझ्यावरही आणली आहे. शेतकरीचळवळीतील उल्हास पाटील यांचाही त्यांनी वापर केला आहे. प्रस्थापितांवर तोफा डागण्यासाठी माझाही वापर करण्यात आला.राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेत पुणे येथील महात्मा फुले वाड्यात जाऊन फुले यांचे दर्शन घेतले आणि भाजपला पाठिंबा देऊन मी चूक केली, असेभावनिक वक्तव्य केले. यामागे त्यांना मला संघटनेतून बाजूला करण्याचाच डाव असल्याचे त्यावेळीच स्पष्ट केले होते. त्यानंतर राष्ट्रपती निवडीवेळीत्यांची भूमिका काय होती? असाही टोला खोत यांनी मारला.