शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:21 IST

सांगली महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगावमधील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली असल्याची तक्रार गुरुवारी आयुक्तांकडे करण्यात आली.

ठळक मुद्देशेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी शेतकऱ्यांची पिके वाळू लागल्याची आयुक्तांकडे तक्रार

सांगली : महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगावमधील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली असल्याची तक्रार गुरुवारी आयुक्तांकडे करण्यात आली.धुळगाव येथील ग्रामस्थ डॉ. विनोद डुबल, भास्कर डुबल, सागर डुबल, श्रीकांत शिंदे, अजितसिंह डुबल, महंमद कामिरकर, नरेंद्र पाटील, श्रीकांत सूर्यवंशी, राजू देवर्षी, दामाजी डुबल, चंद्रकांत जाधव, सतीश जाधव, मौला मगदूम यांच्यासह शेतकऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका शेरीनाला योजनेच्या धुळगावकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हची आयुक्तांच्या आदेशानुसार दुरुस्ती केली होती. ती तोडून सध्या पाणीचोरी सुरु आहे. यामुळे मूळ लाभार्थी असलेल्या धुळगावच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी जात नाही. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून धमकावले जात आहे.दमदाटी, शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शेरीनाल्याची जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरोधात महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वीच नोटिसा बजाविल्या होत्या. यात महापालिकेने पाणी चोरी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पण प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे पाणी चोरणाऱ्यांचे धाडस वाढले आहे.

एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती केली असतानाही, ती तोडून पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे धुळगावमधील आॅक्सिडेशन पाँडपर्यंत शेरीनाल्याचे पाणीच पोहोचत नाही. या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली