शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेरीनाला धुळगाव योजनाच्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST

संजयनगर : सांगलीतून धुळगावकडे (ता. मिरज) जाणाऱ्या शहरी नाल्याच्या जलवाहिनीला जुना बुधगाव मार्गावरील गायत्रीनगर येथे आठ दिवसांपासून गळती ...

संजयनगर : सांगलीतून धुळगावकडे (ता. मिरज) जाणाऱ्या शहरी नाल्याच्या जलवाहिनीला जुना बुधगाव मार्गावरील गायत्रीनगर येथे आठ दिवसांपासून गळती लागली आहे. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात व मोकळ्या जागेत शिरले आहे. साठलेल्या या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महानगरपालिका व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

येथील अशोक पाटील यांच्या दारात सांडपाणी साठले आहे; काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मोकळ्या जागेतही पाणी साचले आहे. याबाबत नागरिकांनी नगरसेवकांकडे पाठपुरावा केला; परंतु सांडपाण्याचा निचरा झाला नाही. अधिकारी आमचे ऐकत नसल्याचे कारण नगरसेवक देत आहेत.

नगरसेवक व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी साठलेल्या सांडपाण्याचा निचरा करावा, अशी मागणी होत आहे.

फोटो-०३दुपटे१

फोटो ओळ : सांगली येथील गायत्रीनगरमध्ये शहरी नाल्याच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साठले आहे. छाया : सुरेंद्र दुपटे