शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आबा-काकांच्या संघर्षाला तीव्र धार

By admin | Updated: August 29, 2014 23:14 IST

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ : व्यूहरचनेला वेग

अर्जुन कर्पे -कवठेमहांकाळ -तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकीय कुरूक्षेत्रावर राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. बेरजेच्या आणि वजाबाकीच्या राजकारणाला गती येऊन राजकीय व्यूहरचनेस सुरुवात झाली आहे. महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी खा. संजयकाका पाटील व अजितराव घोरपडे यांच्या राजकीय कार्यक्रमाला अलविदा करत गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्याशी पुन्हा राजकीय याराना केला आहे, तर राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत, शिवबंधनात अडकलेले जयसिंगराव शेंडगे यांनी खा. पाटील आणि घोरपडे यांच्याशी नवी राजकीय दुनियादारी सुरू केल्याने, तालुक्याचे राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे.कवठेमहांकाळ तालुक्याला राजकीय संघर्ष नवा नाही. येथील ‘महांकाली’च्या पांढरीने अनेक राजकीय उलथा-पालथी पाहिल्या, पचवल्या व टोकाचा संघर्षही झेलला. पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयाला असणाऱ्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपचे खा. पाटील यांच्या सहकार्याच्या बळावर रणशिंग फुंगले असून फौजफाटा जमवण्यास सुरुवात केली आहे. घोरपडे यांनी रात्र न् दिवस वाड्या-वस्त्यांवर बैठका-भेटी देऊन मतदारसंघ ढवळून काढला आहे. गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तालुक्यातील काही ठिकाणी सगरे-घोरपडे आणि काका यांनी एकत्रित आघाडी करून आबांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीवर या त्रिकुटाने झेंडा फडकवत आबा गटाला जोरदार धक्काही दिला होता. मधील काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सध्या सगरे आणि आबांमधील बेबनाव संपुष्टात आला आहे.नुकताच कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ‘भारत निर्माण योजने’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या होर्डींग्जवर काका, घोरपडे, सगरे आणि शेंडगे यांची एकत्रित छायाचित्रे झळकल्याने तालुक्यात वेगळ्याच चर्चेला उधाण आले. परंतु या कार्यक्रमाला सगरे यांनी हजेरी लावली नाही. सगरे समर्थक ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच चंद्रकांत सगरे यांनीही अनुपस्थित राहून राष्ट्रवादीशी व आबांशी ‘राजकीय याराना’ घट्ट असल्याचे संकेत दिले. या कार्यक्रमाला जयसिंगराव शेंडगे यांनी मात्र हजेरी लावली होती.एकूणच तालुक्यातील सध्याच्या राजकारणाचा विचार करता, शेंडगे-घोरपडे-काका यांची नवीन राजकीय मैत्री जनतेच्या पचनी पडणार, की सगरे आणि आबांची राजकीय यारीच ‘लय भारी’ ठरणार, याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. बदलते राजकारणशिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले जयसिंगराव शेंडगे यांनी भारत निर्माण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून, तालुक्यात घोरपडे-काका-शेंडगे या नव्या राजकीय समीकरणाची नांदी केली. शेंडगे आणि घोरपडे यांचा टोकाचा राजकीय संघर्ष गेली वीस वर्षे तालुक्याने पाहिला आहे. विधानसभा संघर्षात एकदा शिवाजीराव शेंडगे यांची सरशी झाली, तर तब्बल तीन वेळा घोरपडेंनी बाजी मारली. या संघर्षात तालुक्यातील जनताही भरडली गेली. परंतु राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र असू शकत नाही, हेच राजकीय सूत्र खरे ठरले आहे.