शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सरसकट कर्जमाफीची धमक मुख्यमंत्र्यांत नाही : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:06 IST

शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देमणेराजुरीत सभा; गडकिल्ल्यात छमछम वाजवू पाहणारे सरकार हटवा

तासगाव : उद्योगपतींनी बुडवलेले ८१ हजार कोटींचे कर्ज सरकारने भरले. मात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची धमक मुख्यमंत्री आणि सरकारमध्ये नसल्याची टीका राष्टवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे मंगळवारी केली. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्टÑवादीच्या उमेदवार, आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा झाली. यावेळी आमदार पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, रोहित पाटील, राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अरुण लाड, अनिता सगरे, बाजार समितीचे सभापती जयसिंग जमदाडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफी करण्याची धमक नाही. आॅनलाईन कर्जमाफी देणार म्हणून सांगितले. ३१ टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला; मात्र ६९ टक्के लोकांना छदामसुध्दा मिळाला नाही. आम्ही १२ टक्क्यांचे व्याज शून्य टक्क्यांपर्यंत आणले. आजही तसाच लाभ दिला जातो; मात्र हे सरकार याप्रश्नी उदासीन आहे.पवार म्हणाले, महाराष्टÑ आमच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री सांगतात, मैदानात आमच्यासमोर पैलवान नसल्याचे सांगतात, पण मी त्यांना सांगितले, ‘मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे. कुस्तीचे काम तुमचे नव्हे’. अमित शहा प्रश्न विचारतात,‘पवार साहबने क्या किया’. हे मोदींचा हात धरून गुजरातमधून केंद्रात आले.

पाच वर्षांपूर्वी अमित शहा देशाला माहीत तरी होते का? महाराष्टÑात सत्ता यांची. यांनी काय केले हे सांगायचे सोडून पवारांनी काय केले, हे विचारतात. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी केले. त्यानंतर वीटसुध्दा टाकली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. भाजप सरकारने भूमिपूजन केले. त्याचीही पाच वर्षात वीट पडली नाही. महाराष्टÑाचे किल्ले सुधारणार, असे सांगून तेथे हॉटेल, बार काढण्याचा निर्णय या सरकारने घेतला. बार म्हटले की छमछम आलीच. जेथे शिवबांची तलवार तळपली, तिथे छमछम वाजवणार असतील, तर यासाठी सरकारला मते द्यायची का?आबांना महाराष्ट्र विसरणार नाहीतासगाव कारखाना सुरू करण्याचा आर. आर. पाटील यांचा ध्यास होता. तो सुरू केला नाही. आबा गेल्याचे दु:ख आहे; मात्र आबांचा विचार महाराष्ट कदापी विसरणार नाही. आबांच्या विचारांसाठी सुमनतार्इंना निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSangliसांगली