शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

सरसकट कर्जमाफीची धमक मुख्यमंत्र्यांत नाही : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:06 IST

शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देमणेराजुरीत सभा; गडकिल्ल्यात छमछम वाजवू पाहणारे सरकार हटवा

तासगाव : उद्योगपतींनी बुडवलेले ८१ हजार कोटींचे कर्ज सरकारने भरले. मात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची धमक मुख्यमंत्री आणि सरकारमध्ये नसल्याची टीका राष्टवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे मंगळवारी केली. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्टÑवादीच्या उमेदवार, आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा झाली. यावेळी आमदार पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, रोहित पाटील, राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अरुण लाड, अनिता सगरे, बाजार समितीचे सभापती जयसिंग जमदाडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफी करण्याची धमक नाही. आॅनलाईन कर्जमाफी देणार म्हणून सांगितले. ३१ टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला; मात्र ६९ टक्के लोकांना छदामसुध्दा मिळाला नाही. आम्ही १२ टक्क्यांचे व्याज शून्य टक्क्यांपर्यंत आणले. आजही तसाच लाभ दिला जातो; मात्र हे सरकार याप्रश्नी उदासीन आहे.पवार म्हणाले, महाराष्टÑ आमच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री सांगतात, मैदानात आमच्यासमोर पैलवान नसल्याचे सांगतात, पण मी त्यांना सांगितले, ‘मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे. कुस्तीचे काम तुमचे नव्हे’. अमित शहा प्रश्न विचारतात,‘पवार साहबने क्या किया’. हे मोदींचा हात धरून गुजरातमधून केंद्रात आले.

पाच वर्षांपूर्वी अमित शहा देशाला माहीत तरी होते का? महाराष्टÑात सत्ता यांची. यांनी काय केले हे सांगायचे सोडून पवारांनी काय केले, हे विचारतात. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी केले. त्यानंतर वीटसुध्दा टाकली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. भाजप सरकारने भूमिपूजन केले. त्याचीही पाच वर्षात वीट पडली नाही. महाराष्टÑाचे किल्ले सुधारणार, असे सांगून तेथे हॉटेल, बार काढण्याचा निर्णय या सरकारने घेतला. बार म्हटले की छमछम आलीच. जेथे शिवबांची तलवार तळपली, तिथे छमछम वाजवणार असतील, तर यासाठी सरकारला मते द्यायची का?आबांना महाराष्ट्र विसरणार नाहीतासगाव कारखाना सुरू करण्याचा आर. आर. पाटील यांचा ध्यास होता. तो सुरू केला नाही. आबा गेल्याचे दु:ख आहे; मात्र आबांचा विचार महाराष्ट कदापी विसरणार नाही. आबांच्या विचारांसाठी सुमनतार्इंना निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSangliसांगली