शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीची धमक मुख्यमंत्र्यांत नाही : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:06 IST

शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देमणेराजुरीत सभा; गडकिल्ल्यात छमछम वाजवू पाहणारे सरकार हटवा

तासगाव : उद्योगपतींनी बुडवलेले ८१ हजार कोटींचे कर्ज सरकारने भरले. मात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची धमक मुख्यमंत्री आणि सरकारमध्ये नसल्याची टीका राष्टवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे मंगळवारी केली. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्टÑवादीच्या उमेदवार, आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा झाली. यावेळी आमदार पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, रोहित पाटील, राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अरुण लाड, अनिता सगरे, बाजार समितीचे सभापती जयसिंग जमदाडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफी करण्याची धमक नाही. आॅनलाईन कर्जमाफी देणार म्हणून सांगितले. ३१ टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला; मात्र ६९ टक्के लोकांना छदामसुध्दा मिळाला नाही. आम्ही १२ टक्क्यांचे व्याज शून्य टक्क्यांपर्यंत आणले. आजही तसाच लाभ दिला जातो; मात्र हे सरकार याप्रश्नी उदासीन आहे.पवार म्हणाले, महाराष्टÑ आमच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री सांगतात, मैदानात आमच्यासमोर पैलवान नसल्याचे सांगतात, पण मी त्यांना सांगितले, ‘मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे. कुस्तीचे काम तुमचे नव्हे’. अमित शहा प्रश्न विचारतात,‘पवार साहबने क्या किया’. हे मोदींचा हात धरून गुजरातमधून केंद्रात आले.

पाच वर्षांपूर्वी अमित शहा देशाला माहीत तरी होते का? महाराष्टÑात सत्ता यांची. यांनी काय केले हे सांगायचे सोडून पवारांनी काय केले, हे विचारतात. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी केले. त्यानंतर वीटसुध्दा टाकली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. भाजप सरकारने भूमिपूजन केले. त्याचीही पाच वर्षात वीट पडली नाही. महाराष्टÑाचे किल्ले सुधारणार, असे सांगून तेथे हॉटेल, बार काढण्याचा निर्णय या सरकारने घेतला. बार म्हटले की छमछम आलीच. जेथे शिवबांची तलवार तळपली, तिथे छमछम वाजवणार असतील, तर यासाठी सरकारला मते द्यायची का?आबांना महाराष्ट्र विसरणार नाहीतासगाव कारखाना सुरू करण्याचा आर. आर. पाटील यांचा ध्यास होता. तो सुरू केला नाही. आबा गेल्याचे दु:ख आहे; मात्र आबांचा विचार महाराष्ट कदापी विसरणार नाही. आबांच्या विचारांसाठी सुमनतार्इंना निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSangliसांगली