शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

शांतिनिकेतनचा कर्मयोगी पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 21:37 IST

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे.

सांगली : प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे. रविवार १४ जानेवारी रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी संस्थेच्या बिसूर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तानाजी पाटील व कलाविश्व महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक शामराव जगताप यांना ‘माई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ही माहिती फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाºया त्याचप्रभाणे या क्षेत्रात नवनवे प्रयोग करुन समाजाला नवी दिशा देणाºया, समाजातील गोरगरीब, कष्टकरी बहुजन समाज स्वावलंबी आणि स्वाभिमानी व्हावा यासाठी कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी फोरम कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून निरपेक्षपणे कार्य करणाºया संस्थेस, कार्यकर्त्यास  प्रतिवर्षी ‘कर्मयोगी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहिर करण्यात आला आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील हे सन्मान स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमास माजी अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल आॅफ पोलिस, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवानराव मोरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आहेत, कर्मवीरअण्णांची रयत शिक्षण संस्था आज शतक महोत्सव साजरा करीत आहे. डॉ. अनिल पाटील यांनी चेअरमन पदाची सुत्रे घेतल्यानंतर ही संस्था ग्लोबल व्हायला सुरवात झाली. शिक्षणाबाबत नवी नजर आणि ध्येय असलेले डॉ. पाटील यांनी रयतचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कर्मयोगी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कर्मवीरअण्णांचा वारसा जपत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी. बी. पाटील यांनीही शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.  ही व्यवस्था कारकून तयार करणारी नसून माणसाला माणून घडविणारी आहे, हा विचार कर्मवीरअण्णांचा होता. तोच विचार घेऊन डॉ. पी. बी. पाटील व त्यांच्यानंतर संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनची वाटचाल सुरू असल्याचेही थोरात यांनी सांगितले.