शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
4
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
5
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
7
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
8
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
9
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
10
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
11
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
12
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
13
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
14
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
15
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
16
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
17
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
18
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
19
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
20
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

शांतिनिकेतनचा कर्मयोगी पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 21:37 IST

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे.

सांगली : प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे. रविवार १४ जानेवारी रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी संस्थेच्या बिसूर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तानाजी पाटील व कलाविश्व महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक शामराव जगताप यांना ‘माई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ही माहिती फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाºया त्याचप्रभाणे या क्षेत्रात नवनवे प्रयोग करुन समाजाला नवी दिशा देणाºया, समाजातील गोरगरीब, कष्टकरी बहुजन समाज स्वावलंबी आणि स्वाभिमानी व्हावा यासाठी कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी फोरम कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून निरपेक्षपणे कार्य करणाºया संस्थेस, कार्यकर्त्यास  प्रतिवर्षी ‘कर्मयोगी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहिर करण्यात आला आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील हे सन्मान स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमास माजी अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल आॅफ पोलिस, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवानराव मोरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आहेत, कर्मवीरअण्णांची रयत शिक्षण संस्था आज शतक महोत्सव साजरा करीत आहे. डॉ. अनिल पाटील यांनी चेअरमन पदाची सुत्रे घेतल्यानंतर ही संस्था ग्लोबल व्हायला सुरवात झाली. शिक्षणाबाबत नवी नजर आणि ध्येय असलेले डॉ. पाटील यांनी रयतचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कर्मयोगी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कर्मवीरअण्णांचा वारसा जपत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी. बी. पाटील यांनीही शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.  ही व्यवस्था कारकून तयार करणारी नसून माणसाला माणून घडविणारी आहे, हा विचार कर्मवीरअण्णांचा होता. तोच विचार घेऊन डॉ. पी. बी. पाटील व त्यांच्यानंतर संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनची वाटचाल सुरू असल्याचेही थोरात यांनी सांगितले.