शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

शांतिनिकेतनचा कर्मयोगी पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 21:37 IST

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे.

सांगली : प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे. रविवार १४ जानेवारी रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी संस्थेच्या बिसूर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तानाजी पाटील व कलाविश्व महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक शामराव जगताप यांना ‘माई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ही माहिती फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाºया त्याचप्रभाणे या क्षेत्रात नवनवे प्रयोग करुन समाजाला नवी दिशा देणाºया, समाजातील गोरगरीब, कष्टकरी बहुजन समाज स्वावलंबी आणि स्वाभिमानी व्हावा यासाठी कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी फोरम कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून निरपेक्षपणे कार्य करणाºया संस्थेस, कार्यकर्त्यास  प्रतिवर्षी ‘कर्मयोगी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहिर करण्यात आला आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील हे सन्मान स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमास माजी अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल आॅफ पोलिस, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवानराव मोरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आहेत, कर्मवीरअण्णांची रयत शिक्षण संस्था आज शतक महोत्सव साजरा करीत आहे. डॉ. अनिल पाटील यांनी चेअरमन पदाची सुत्रे घेतल्यानंतर ही संस्था ग्लोबल व्हायला सुरवात झाली. शिक्षणाबाबत नवी नजर आणि ध्येय असलेले डॉ. पाटील यांनी रयतचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कर्मयोगी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कर्मवीरअण्णांचा वारसा जपत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी. बी. पाटील यांनीही शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.  ही व्यवस्था कारकून तयार करणारी नसून माणसाला माणून घडविणारी आहे, हा विचार कर्मवीरअण्णांचा होता. तोच विचार घेऊन डॉ. पी. बी. पाटील व त्यांच्यानंतर संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनची वाटचाल सुरू असल्याचेही थोरात यांनी सांगितले.