शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

शैला दाभोलकर यांना ‘ज्ञानभागीरथी’ पुरस्कार प्रदान

By admin | Updated: June 28, 2014 00:43 IST

कवठेएकंदला कार्यक्रम : परिवर्तन परिक्रमा संस्थेतर्फे गौरव

कवठेएकंद : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांच्या मातोश्री भागीरथी रामचंद्र गुरव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त तासगाव येथील परिवर्तन परिक्रमा संस्थेच्यावतीने पहिला ‘ज्ञानभागीरथी’ पुरस्कार शैला दाभोलकर यांना आज (शुक्रवारी) प्रदान करण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूलनाच्या चळवळीतून समाजात विधायक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल दाभोलकर यांना हा पुरस्कार कवठेएकंद (ता. तासगाव) येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनीमध्ये कॅ. राम लाड व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख १० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.परिवर्तन परिक्रमा संस्थेतर्फे यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती तसेच विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना शैला दाभोलकर म्हणाल्या की, चांगल्या विचारातून कृती झाल्यानंतरच समाजसुधारणेसाठीचे पाऊल पुढे पडते. ते विधायक परिवर्तनासाठी सहाय्यभूत ठरणारी गोष्ट आहे. पहिला ‘ज्ञानभागीरथी’ पुरस्कार या मातीतून आणि विचारातून मला मिळाला आहे, ही माझ्यादृष्टीने अत्यंत गौरवाची बाब आहे. भागीरथी गुरव यांच्या कार्याविषयी त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव यांनी स्वागत केले. आपल्या मातोश्री भागीरथी गुरव यांची, मुलांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाची कास सोडता कामा नये, अशी तळमळ होती. त्याच विचाराच्या समाजातील गरीब, होतकरू, गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप मिळावी म्हणून त्यांचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शाहीर शीतल साठे यांनी आईची महती सांगणारी गीते सादर केली. जी. पी. (काका) पाटील, अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, हौसाताई पाटील यांचीही भाषणे झाली. माजी आमदार हाफिज धत्तुरे, विजय कराडे, प्रा. बाबूराव लगारे, बाळासाहेब गुरव, प्राचार्य गोरख पवार, अनिल म्हमाणे, जंबूभाऊ शिरोटे, राजाराम माळी, प्रा. एन. डी. कदम आदी उपस्थित होते. फारूक गवंडी यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. विवेक गुरव यांनी आभार मानले. (वार्ताहर)