शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

लढत राहा, मी पाठीशी ठाम : नरसय्या आडम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:09 IST

सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणा-या वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला,

ठळक मुद्देसांगलीत वसंतबाग आंदोलनासमोर मार्गदर्शनशाहीनबाग हा दुसरा स्वातंत्र्य लढा

सांगली : तरुणांना रोजगार देण्याऐवजी मोदी-शहांचे सरकार गरिबांच्या मागे लागले आहे. त्यांनी आणलेल्या नागरिकत्वविषयक कायद्यांविरोधातील लढा शांततेत सुरु ठेवा. शाहीनबाग म्हणजे दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगारनेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.

सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणाºया वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला, मुंबईत बांगलादेशी किती आहेत? गृहमंत्री गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, फक्त दोन आहेत. तीच अवस्था देशाची आहे. मोदी-शहा मोजक्या लोकांसाठी देशाला हैराण करायला निघाले आहेत. देशासाठी तुमचे किती लोक शहीद झालेत? असा त्यांना माझा प्रश्न आहे.

नोटाबंदी, तीन तलाक, ३७० कलम, राम मंदिर या सर्वबाबतीत मुस्लिम गप्प बसले. पण आता नागरिकत्व कायद्यावेळी देशातील १३० कोटी जनता विरोधात एकवटली आहे. केरळ सरकारने हा कायदा चालणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ७० लाख लोक ६२० किलोमीटर रॅलीद्वारे तिरंगा घेऊन निघाले. विरोध केला. देशातील ३२ लाख गरीब लोक एकवेळच्या अन्नावर जगत आहेत. दरवर्षी ७० लाख बालकांचा जन्मत:च मृत्यू होत आहे. यावर उपाय करण्याऐवजी जाती-धर्माचे राजकारण सुरू आहे .

तरुणांना रोजगार दिला तरच देश पुढे जाईल. अमित शहांच्या मुलाची संपत्ती एका वर्षात ८० हजार कोटींवर गेली, पण आमचे तरुण नोकºया नसल्याने आत्महत्या करत आहेत. सरकार त्यांच्या मागे लागले आहे. सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

या लढ्यात हिंदू, मुस्लिम, दलित सगळेच सामील आहेत. या लढ्यात लढताना मला गोळी लागली तरी मृत्यूचे मी स्वागत करतो. दिल्लीत मतदारांनी काल निकाल दिला आहे, आता देशातील १३० कोटी जनता निकाल देईल; मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही. अमित शहांना वाटते, पोलीस हातात आहेत. पण जनता ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणीबाणीमुळे जनतेने इंदिरा गांधींचे सरकारही उलथवले होते हे लक्षात घ्यावे. देशात जाती-धर्माच्या नावावर यापूर्वी कधीही शासन चालले नव्हते. ९० कोटी लोकांकडे १९५१ पूर्वीचे पुरावे नाहीत. त्यांना तुरुंगात डांबणार काय? शांततेत लढा सुरु ठेवा, मी पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.

आमच्या हाती घटनाआडम मास्तर म्हणाले, काल कोणी तरी तलवारीला तलवार, दगडाला दगडाची भाषा केली. पण आमच्या हातात तलवार, दगड काहीही नाही. बाबासाहेबांनी दिलेले संविधान, महात्मा गांधींचा तिरंगा व शहीद भगतसिंगांचा ‘इन्कलाब’चा नारा आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप