शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

लढत राहा, मी पाठीशी ठाम : नरसय्या आडम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:09 IST

सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणा-या वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला,

ठळक मुद्देसांगलीत वसंतबाग आंदोलनासमोर मार्गदर्शनशाहीनबाग हा दुसरा स्वातंत्र्य लढा

सांगली : तरुणांना रोजगार देण्याऐवजी मोदी-शहांचे सरकार गरिबांच्या मागे लागले आहे. त्यांनी आणलेल्या नागरिकत्वविषयक कायद्यांविरोधातील लढा शांततेत सुरु ठेवा. शाहीनबाग म्हणजे दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगारनेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.

सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणाºया वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला, मुंबईत बांगलादेशी किती आहेत? गृहमंत्री गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, फक्त दोन आहेत. तीच अवस्था देशाची आहे. मोदी-शहा मोजक्या लोकांसाठी देशाला हैराण करायला निघाले आहेत. देशासाठी तुमचे किती लोक शहीद झालेत? असा त्यांना माझा प्रश्न आहे.

नोटाबंदी, तीन तलाक, ३७० कलम, राम मंदिर या सर्वबाबतीत मुस्लिम गप्प बसले. पण आता नागरिकत्व कायद्यावेळी देशातील १३० कोटी जनता विरोधात एकवटली आहे. केरळ सरकारने हा कायदा चालणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ७० लाख लोक ६२० किलोमीटर रॅलीद्वारे तिरंगा घेऊन निघाले. विरोध केला. देशातील ३२ लाख गरीब लोक एकवेळच्या अन्नावर जगत आहेत. दरवर्षी ७० लाख बालकांचा जन्मत:च मृत्यू होत आहे. यावर उपाय करण्याऐवजी जाती-धर्माचे राजकारण सुरू आहे .

तरुणांना रोजगार दिला तरच देश पुढे जाईल. अमित शहांच्या मुलाची संपत्ती एका वर्षात ८० हजार कोटींवर गेली, पण आमचे तरुण नोकºया नसल्याने आत्महत्या करत आहेत. सरकार त्यांच्या मागे लागले आहे. सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

या लढ्यात हिंदू, मुस्लिम, दलित सगळेच सामील आहेत. या लढ्यात लढताना मला गोळी लागली तरी मृत्यूचे मी स्वागत करतो. दिल्लीत मतदारांनी काल निकाल दिला आहे, आता देशातील १३० कोटी जनता निकाल देईल; मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही. अमित शहांना वाटते, पोलीस हातात आहेत. पण जनता ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणीबाणीमुळे जनतेने इंदिरा गांधींचे सरकारही उलथवले होते हे लक्षात घ्यावे. देशात जाती-धर्माच्या नावावर यापूर्वी कधीही शासन चालले नव्हते. ९० कोटी लोकांकडे १९५१ पूर्वीचे पुरावे नाहीत. त्यांना तुरुंगात डांबणार काय? शांततेत लढा सुरु ठेवा, मी पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.

आमच्या हाती घटनाआडम मास्तर म्हणाले, काल कोणी तरी तलवारीला तलवार, दगडाला दगडाची भाषा केली. पण आमच्या हातात तलवार, दगड काहीही नाही. बाबासाहेबांनी दिलेले संविधान, महात्मा गांधींचा तिरंगा व शहीद भगतसिंगांचा ‘इन्कलाब’चा नारा आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप