शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लढत राहा, मी पाठीशी ठाम : नरसय्या आडम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:09 IST

सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणा-या वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला,

ठळक मुद्देसांगलीत वसंतबाग आंदोलनासमोर मार्गदर्शनशाहीनबाग हा दुसरा स्वातंत्र्य लढा

सांगली : तरुणांना रोजगार देण्याऐवजी मोदी-शहांचे सरकार गरिबांच्या मागे लागले आहे. त्यांनी आणलेल्या नागरिकत्वविषयक कायद्यांविरोधातील लढा शांततेत सुरु ठेवा. शाहीनबाग म्हणजे दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगारनेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.

सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणाºया वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला, मुंबईत बांगलादेशी किती आहेत? गृहमंत्री गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, फक्त दोन आहेत. तीच अवस्था देशाची आहे. मोदी-शहा मोजक्या लोकांसाठी देशाला हैराण करायला निघाले आहेत. देशासाठी तुमचे किती लोक शहीद झालेत? असा त्यांना माझा प्रश्न आहे.

नोटाबंदी, तीन तलाक, ३७० कलम, राम मंदिर या सर्वबाबतीत मुस्लिम गप्प बसले. पण आता नागरिकत्व कायद्यावेळी देशातील १३० कोटी जनता विरोधात एकवटली आहे. केरळ सरकारने हा कायदा चालणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ७० लाख लोक ६२० किलोमीटर रॅलीद्वारे तिरंगा घेऊन निघाले. विरोध केला. देशातील ३२ लाख गरीब लोक एकवेळच्या अन्नावर जगत आहेत. दरवर्षी ७० लाख बालकांचा जन्मत:च मृत्यू होत आहे. यावर उपाय करण्याऐवजी जाती-धर्माचे राजकारण सुरू आहे .

तरुणांना रोजगार दिला तरच देश पुढे जाईल. अमित शहांच्या मुलाची संपत्ती एका वर्षात ८० हजार कोटींवर गेली, पण आमचे तरुण नोकºया नसल्याने आत्महत्या करत आहेत. सरकार त्यांच्या मागे लागले आहे. सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

या लढ्यात हिंदू, मुस्लिम, दलित सगळेच सामील आहेत. या लढ्यात लढताना मला गोळी लागली तरी मृत्यूचे मी स्वागत करतो. दिल्लीत मतदारांनी काल निकाल दिला आहे, आता देशातील १३० कोटी जनता निकाल देईल; मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही. अमित शहांना वाटते, पोलीस हातात आहेत. पण जनता ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणीबाणीमुळे जनतेने इंदिरा गांधींचे सरकारही उलथवले होते हे लक्षात घ्यावे. देशात जाती-धर्माच्या नावावर यापूर्वी कधीही शासन चालले नव्हते. ९० कोटी लोकांकडे १९५१ पूर्वीचे पुरावे नाहीत. त्यांना तुरुंगात डांबणार काय? शांततेत लढा सुरु ठेवा, मी पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.

आमच्या हाती घटनाआडम मास्तर म्हणाले, काल कोणी तरी तलवारीला तलवार, दगडाला दगडाची भाषा केली. पण आमच्या हातात तलवार, दगड काहीही नाही. बाबासाहेबांनी दिलेले संविधान, महात्मा गांधींचा तिरंगा व शहीद भगतसिंगांचा ‘इन्कलाब’चा नारा आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप