शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

नगराध्यक्षांनी चमकोगिरीचा उद्योग बंद करावा -- शहाजी पाटील, दादासाहेब पाटील : इस्लामपुरातील विकासकामावरून राजकारण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:55 IST

इस्लामपूर : नगराध्यक्षांनी आमदार जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील व उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी गेल्या ११ महिन्यांत विकासाचा

इस्लामपूर : नगराध्यक्षांनी आमदार जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील व उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी गेल्या ११ महिन्यांत विकासाचा कोणताही नवीन प्रस्ताव न तयार करता केवळ कूटनीतीचे राजकारण करणारे नगराध्यक्ष स्वत:चा टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला शनिवारी पत्रकार बैठकीत मारला.

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांना पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. याप्रसंगी राजरामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मेडिकल कॉलेजला विरोध केला असेल, तर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव का दिले? त्यांना आपल्या संस्थेत वेळोवेळी नेऊन कार्यक्रम का केले? आ. पाटील यांच्या १५ वर्षांच्या काळात बगलबच्चांचाच विकास झाला, असे म्हणता; मग आपणही त्या काळात त्यांचे एक खंदे कार्यकर्ते होता. आपला विकास त्यांच्या माध्यमातूनच झाला काय?

शहाजी पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील जर अडवणुकीचे, दबावाचे, इतरांना त्रास देण्याचे राजकारण करीत असते, तर वाळवा तालुक्यातील जनतेने त्यांना सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून दिले असते का? गेल्या ३५ वर्षांत त्यांचे नेतृत्व तळहातावरील फोडाप्रमाणे जपले असते का? त्यांचा स्वभाव, कामाची पद्धत केवळ वाळवा तालुक्यासच नव्हे, तर जिल्हा व राज्याला माहीत आहे. आपण त्याची काळजी करू नका. आ. पाटील यांनी कारखाना, बँक, दूध संघ, सूतगिरणी, आदी सहकारी संस्था स्थापन केलेल्या नाहीत, हे खरे आहे. मात्र, त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या संस्थांमध्ये पारदर्शी व काटकसरीने कारभार करीत या संस्थांची मोठी वाढ झाली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ‘आम्ही तालुक्यातील जनतेस गुलामगिरीतून मुक्त केले’ असे वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी व क्रांतिकारी जनतेचा अपमान करणारे विधान केले होते. याबद्दल त्यांना बोलू द्या, तुम्ही त्यांची वकिली कशाला करता?आकडेवारी चुकीची...नगराध्यक्षांनी इस्लामपूरच्या विकासकामांची दिलेली आकडेवारी चुकीची व दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या कार्यकाळात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांशिवाय कोणताही निधी शासनाकडून आलेला नाही. नगरपालिकेत असलेली ठेव व शिलकीची रक्कम रुपये ५२ कोटी आमच्या काळातीलच आहेत. त्याच्यात तुमचे कर्तृत्व काय, असा टोलाही त्यांनी दिला.