शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

नवे उद्योग आणण्यासाठी आता मुंबईत ठाण मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अनेक वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा ते वाढविण्याचेच काम केले, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अनेक वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा ते वाढविण्याचेच काम केले, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत केली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी लाड यांनी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये ठाण मांडावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सकल जैन समाजातर्फे येथील राजमती भवनात सांगलीत पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा सत्कार मंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. लाड व जयंत पाटील यांना यावेळी संस्कृतमधील मानपत्र प्रदान केले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, पदवीधरांचे शंभरहून अधिक प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीची आहे. पदवीधरांनी भाजप हा पक्ष नुकसान करणारा आहे, हे ओळखून त्यांनी लाड यांना निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी आता हे प्रश्न सोडविण्यासाठी सहा वर्षे पाठपुरावा करावा. शासनामार्फत आम्ही त्यासाठी ताकद लावू.

पदवीधरांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी एक संकेतस्थळ किंवा पोर्टल तयार करुन लाड यांनी प्रथम पदवीधरांच्या प्रश्नांची यादी तयार करावी. ते प्रश्न कोणत्या माध्यमातून सोडवायचे, याचा विचार केला जाईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी लाड यांनी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये ठाण मांडावे.

सुरेश पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कर्नाटकात जितक्या सवलती जैन समाजाला मिळतात, तितक्या महाराष्ट्रात मिळत नाहीत. त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. मुस्लिम समाजाला आरक्षण व सवलती देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. त्याप्रमाणे अन्य अल्पसंख्याकांचेही प्रश्न सोडवावेत. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सुरेश बेदमुथा, संजय बजाज आदी उपस्थित होते.

चौकट

पाखरांपेक्षा निष्ठावंतांना किंमत द्या

सुरेश पाटील म्हणाले की, जिथे पीक येईल तिथे येणाऱ्या राजकीय पाखरांना त्यांची जागा दाखवून निष्ठावंतांना चांगली संधी द्यावी. असे झाले तर पक्षवाढीसाठी त्याचा फायदा होईल.

चौकट

वॉच ठेवायलाच हवा

पदवीधरच्या निवडणुकीत कोणी किती कष्ट केले, याची माहिती जयंत पाटील देत होते. त्यावेळी बजाज यांनी, लाड यांची माणसे तरीही आमच्यावर वॉच ठेवत होती, असे सांगितले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, तसा वॉच असायलाच पाहिजे. यावर उपस्थितांत हशा पिकला.