शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

नवे उद्योग आणण्यासाठी आता मुंबईत ठाण मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अनेक वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा ते वाढविण्याचेच काम केले, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अनेक वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा ते वाढविण्याचेच काम केले, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत केली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी लाड यांनी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये ठाण मांडावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सकल जैन समाजातर्फे येथील राजमती भवनात सांगलीत पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा सत्कार मंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. लाड व जयंत पाटील यांना यावेळी संस्कृतमधील मानपत्र प्रदान केले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, पदवीधरांचे शंभरहून अधिक प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीची आहे. पदवीधरांनी भाजप हा पक्ष नुकसान करणारा आहे, हे ओळखून त्यांनी लाड यांना निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी आता हे प्रश्न सोडविण्यासाठी सहा वर्षे पाठपुरावा करावा. शासनामार्फत आम्ही त्यासाठी ताकद लावू.

पदवीधरांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी एक संकेतस्थळ किंवा पोर्टल तयार करुन लाड यांनी प्रथम पदवीधरांच्या प्रश्नांची यादी तयार करावी. ते प्रश्न कोणत्या माध्यमातून सोडवायचे, याचा विचार केला जाईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी लाड यांनी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये ठाण मांडावे.

सुरेश पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कर्नाटकात जितक्या सवलती जैन समाजाला मिळतात, तितक्या महाराष्ट्रात मिळत नाहीत. त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. मुस्लिम समाजाला आरक्षण व सवलती देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. त्याप्रमाणे अन्य अल्पसंख्याकांचेही प्रश्न सोडवावेत. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सुरेश बेदमुथा, संजय बजाज आदी उपस्थित होते.

चौकट

पाखरांपेक्षा निष्ठावंतांना किंमत द्या

सुरेश पाटील म्हणाले की, जिथे पीक येईल तिथे येणाऱ्या राजकीय पाखरांना त्यांची जागा दाखवून निष्ठावंतांना चांगली संधी द्यावी. असे झाले तर पक्षवाढीसाठी त्याचा फायदा होईल.

चौकट

वॉच ठेवायलाच हवा

पदवीधरच्या निवडणुकीत कोणी किती कष्ट केले, याची माहिती जयंत पाटील देत होते. त्यावेळी बजाज यांनी, लाड यांची माणसे तरीही आमच्यावर वॉच ठेवत होती, असे सांगितले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, तसा वॉच असायलाच पाहिजे. यावर उपस्थितांत हशा पिकला.