शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सांगलीत समाजकल्याण विभागाच्या दहा कर्मचाऱ्यांची सेवा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:36 IST

सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेल्या शिपायांच्या नियमबाह्य भरतीमधील दहा कर्मचाºयांना (शिपाई) दि. १७ सप्टेंबरपासून सेवेतून कमी केले आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या या कारवाईमुळे येथील कार्यालयात खळबळ उडाली आहे. या भरतीस जबाबदार असलेले तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे, प्रभारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, विद्यमान सहायक आयुक्त ...

सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेल्या शिपायांच्या नियमबाह्य भरतीमधील दहा कर्मचाºयांना (शिपाई) दि. १७ सप्टेंबरपासून सेवेतून कमी केले आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या या कारवाईमुळे येथील कार्यालयात खळबळ उडाली आहे. या भरतीस जबाबदार असलेले तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे, प्रभारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, विद्यमान सहायक आयुक्त सचिन कवले यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयातील आणि जिल्ह्यातील वसतिगृहामधील शिपाई पदाच्या २७ रिक्त जागांसाठी ७ सप्टेंबर २०१४ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून लगेच लेखी परीक्षा घेतली होती. त्याचदिवशी निवड यादीही प्रसिध्द करण्यात आली. प्रत्यक्षात ही यादी प्रसिध्द करताना निवड समितीचा कोठेही विचार करण्यात आला नाही. निवड समितीला डावलून भरती प्रक्रिया राबविल्याबाबत तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. रिक्त जागांची भरती करताना बिंदू नामावलीबाबत महसूल विभागाच्या सहायक आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आली नाही. शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविताना पारदर्शक पध्दतीचा अवलंब करणे अभिप्रेत असताना, सामान्य प्रशासनाच्या नियमांचे पालन झाले नाही.ही सर्व भरती प्रक्रियाच राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी नियमबाह्य ठरविली आहे. या भरतीमधील २७ पैकी तृप्ती रवींद्र आपटे (मुलींची निवासी शाळा, बांबवडे, ता. पलूस), अंकुश जयसिंग पाटील (मुलांचे वसतिगृह तासगाव), शरद सदाशिव कोळेकर (मुलांचे वसतिगृह, कवठेमहांकाळ), भगवंत दादू कोकरे (मुलांचे वसतिगृह, जत), संतोष सोमा साबळे (मुलांचे वसतिगृह, कडेगाव), विजयश्री बबन भालचिन (मुलींचे वसतिगृह, पलूस), दिनेश बाळासाहेब कलकुटगी (मुलांचे वसतिगृह, विटा, ता. खानापूर), गीता विलास खोत (मुलींचे वसतिगृह, आटपाडी), रोहन संजय दळवी (मुलांचे वसतिगृह, पलूस), सचिन भागवत ढोले (मुलांचे शासकीय वसतिगृह, आटपाडी) या दहा कर्मचाºयांना नियुक्ती दिली होती. त्यांची सेवा दि. १७ सप्टेंबरपासून खंडित केली आहे. उर्वरित १७ कर्मचाºयांना तक्रारी आल्यामुळे नियुक्तीच दिली नव्हती. त्यामुळे त्या कर्मचाºयांची निवड यादी रद्द केली आहे.कर्मचारी न्यायालयात जाणारसहायक आयुक्त कार्यालयाकडे जागा निघाल्यामुळे आम्ही अर्ज करून शासकीय नियमानुसार असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. भरती प्रक्रियेत अधिकाºयांनी चुका केल्या असतील, तर त्यांची शिक्षा आम्हाला का, असा सवाल काही कर्मचाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे केला आहे. या कारवाईविरोधात कामगार न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.समाजकल्याण आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्तांच्या कारवाईमुळे सांगलीच्या सहायक आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे. चुकीच्या, अनियमित, नियमबाह्य भरतीप्रक्रियेस जबाबदार तीन अधिकाºयांचीही सखोल चौकशी केली जाणार आहे.