शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगलीत समाजकल्याण विभागाच्या दहा कर्मचाऱ्यांची सेवा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:36 IST

सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेल्या शिपायांच्या नियमबाह्य भरतीमधील दहा कर्मचाºयांना (शिपाई) दि. १७ सप्टेंबरपासून सेवेतून कमी केले आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या या कारवाईमुळे येथील कार्यालयात खळबळ उडाली आहे. या भरतीस जबाबदार असलेले तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे, प्रभारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, विद्यमान सहायक आयुक्त ...

सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेल्या शिपायांच्या नियमबाह्य भरतीमधील दहा कर्मचाºयांना (शिपाई) दि. १७ सप्टेंबरपासून सेवेतून कमी केले आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या या कारवाईमुळे येथील कार्यालयात खळबळ उडाली आहे. या भरतीस जबाबदार असलेले तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे, प्रभारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, विद्यमान सहायक आयुक्त सचिन कवले यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयातील आणि जिल्ह्यातील वसतिगृहामधील शिपाई पदाच्या २७ रिक्त जागांसाठी ७ सप्टेंबर २०१४ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून लगेच लेखी परीक्षा घेतली होती. त्याचदिवशी निवड यादीही प्रसिध्द करण्यात आली. प्रत्यक्षात ही यादी प्रसिध्द करताना निवड समितीचा कोठेही विचार करण्यात आला नाही. निवड समितीला डावलून भरती प्रक्रिया राबविल्याबाबत तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. रिक्त जागांची भरती करताना बिंदू नामावलीबाबत महसूल विभागाच्या सहायक आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आली नाही. शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविताना पारदर्शक पध्दतीचा अवलंब करणे अभिप्रेत असताना, सामान्य प्रशासनाच्या नियमांचे पालन झाले नाही.ही सर्व भरती प्रक्रियाच राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी नियमबाह्य ठरविली आहे. या भरतीमधील २७ पैकी तृप्ती रवींद्र आपटे (मुलींची निवासी शाळा, बांबवडे, ता. पलूस), अंकुश जयसिंग पाटील (मुलांचे वसतिगृह तासगाव), शरद सदाशिव कोळेकर (मुलांचे वसतिगृह, कवठेमहांकाळ), भगवंत दादू कोकरे (मुलांचे वसतिगृह, जत), संतोष सोमा साबळे (मुलांचे वसतिगृह, कडेगाव), विजयश्री बबन भालचिन (मुलींचे वसतिगृह, पलूस), दिनेश बाळासाहेब कलकुटगी (मुलांचे वसतिगृह, विटा, ता. खानापूर), गीता विलास खोत (मुलींचे वसतिगृह, आटपाडी), रोहन संजय दळवी (मुलांचे वसतिगृह, पलूस), सचिन भागवत ढोले (मुलांचे शासकीय वसतिगृह, आटपाडी) या दहा कर्मचाºयांना नियुक्ती दिली होती. त्यांची सेवा दि. १७ सप्टेंबरपासून खंडित केली आहे. उर्वरित १७ कर्मचाºयांना तक्रारी आल्यामुळे नियुक्तीच दिली नव्हती. त्यामुळे त्या कर्मचाºयांची निवड यादी रद्द केली आहे.कर्मचारी न्यायालयात जाणारसहायक आयुक्त कार्यालयाकडे जागा निघाल्यामुळे आम्ही अर्ज करून शासकीय नियमानुसार असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. भरती प्रक्रियेत अधिकाºयांनी चुका केल्या असतील, तर त्यांची शिक्षा आम्हाला का, असा सवाल काही कर्मचाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे केला आहे. या कारवाईविरोधात कामगार न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.समाजकल्याण आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्तांच्या कारवाईमुळे सांगलीच्या सहायक आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे. चुकीच्या, अनियमित, नियमबाह्य भरतीप्रक्रियेस जबाबदार तीन अधिकाºयांचीही सखोल चौकशी केली जाणार आहे.