शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Lok Sabha Election 2019 सामान्य शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पाठवा: प्रकाश राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:01 AM

इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीतून लोकशाही वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज संसदेपर्यंत पोहोचविण्यासाठी राजू शेट्टींसारख्या, ...

इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीतून लोकशाही वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज संसदेपर्यंत पोहोचविण्यासाठी राजू शेट्टींसारख्या, शेतकऱ्यांचा नेता असणाºया सक्षम आणि योग्य उमेदवारास भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन सिनेअभिनेते प्रकाश राज यांनी केले.येथील गांधी चौकात हातकणंगले लोकसभा मतदार संघातील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गांधी चौकातील जाहीर सभेत प्रकाश राज बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. राजू शेट्टी, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. शामराव पाटील यांच्यासह आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.सभेची वेळ संपण्याआधी १० मिनिटे अगोदर पोहोचलेल्या प्रकाश राज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करतानाच ‘वक्त कम है लेकिन सच बोलने के लिए दो मिनिट काफी है’ म्हणत, मोदी सरकारवर तोफ डागली. कलाकारांना राजकारणाची गरज काय? असा प्रश्न विचारला जातो. मात्र आम्ही कलाकार असलो तरी देशातील सर्व धर्माची जनता आमच्यावर प्रेम करते. अशावेळी देशाचा विचार करणे आवश्यक ठरते. देशातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, देशाची सध्या काय परिस्थिती आहे, याचा विचार केल्यानंतर, सरकार विरोधासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहत नाही.प्रकाश राज म्हणाले, आम्हाला चौकीदाराची गरज नाही, शेतकरी आणि सामान्य जनतेचा विचार महत्त्वाचा आहे. देशातील प्रत्येकाला शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत, त्यासाठी शेतकºयांचा बुलंद आवाज म्हणून खा. राजू शेट्टी यांना विजयी करा.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशामध्ये हुकूमशाहीच्या मार्गाने प्रशासन चालविण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे. लालकृष्ण आडवानी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांसारख्या ज्येष्ठांसह इतरांना मोदींनी बाहेरचा रस्ता दाखविला. त्यामधून आपल्यापेक्षा वरचढ कोणी होऊ नये, अशा हुकूमशाही पद्धतीने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सिद्ध होते. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा हे सरकार निवडण्याची चूक करू नये.राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञासिंग यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या शहिदांचा अपमान केला आहे. त्यामुळे हा महाराष्टÑ त्याचा बदला घेईल.खा. राजू शेट्टी म्हणाले, गेल्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने एनडीएमधून लढलो. त्यावेळी मोदींनी शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा शब्द दिला होता. मात्र दोनच वर्षात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या गोष्टी नाकारून मोदींनी शेतकºयांचा विश्वासघात केला. त्यामुळे मोदींविरोधातील लढ्याची पहिली सुरुवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. शेतकºयांना फसवणाºयांना गाडल्याशिवाय सोडणार नाही. प्रत्येक आंदोलनात आमच्याबरोबर राहिलेल्या शिवसेनेनेही भाजपशी युती करून राज्यातील शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. याचे उत्तर उध्दव ठाकरे यांनी द्यावे.यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत केले. आप्पासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अ‍ॅड. आर. आर. पाटील, भगवानराव पाटील, सुश्मिता जाधव, कॉ. धनाजी गुरव, अरुण कांबळे, संदीप जाधव, मनीषा रोटे, प्राचार्य विश्वास सायनाकर, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे यांनी, खा. शेट्टी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.सत्तेच्या लालसेने भाजप-सेना एकत्रआ. पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे गेली चार वर्षे भाजपवर टीका करीत होते, तर मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेनेची धुलाई करत होते. या संपूर्ण काळात जनतेच्या हिताचा कोणताही विचार त्यांच्याकडून झाला नव्हता. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर सत्तेच्या लालसेने भाजप-सेना एकत्र आले आहेत. या निवडणुकीत त्यांचा टिकाव लागणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक