शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत निवडणुका पुढे न ढकलल्यास आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST

मिरज : ओबीसींचे न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण पूर्वीप्रमाणे लागू करावे, हा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...

मिरज : ओबीसींचे न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण पूर्वीप्रमाणे लागू करावे, हा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शुक्रवारी मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत देण्यात आला. सभेत पूरग्रस्तांबरोबर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला.

मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती गीतांजली कणसे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत पार पडली. संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द ठरविले आहे. या निर्णयाने निवडणूक लढविण्याची संधी मिळणार नसल्याने याचा परिणाम ओबीसींच्या राजकीय भवितव्यावर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द ठरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न करावेत. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशा ठरावाची मागणी करताना निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा किरण बंडगर यांनी दिला.

२०१९ मध्ये भाजप शासनाने पंचनाम्यापूर्वी महापुराच्या नुकसानीचा निधी वर्ग केला होता. मात्र सध्या पंचनामे पूर्ण होऊनही पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळत नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी याकडे लक्ष देऊन पूरग्रस्तांना न्याय द्यावा. सोयाबीन, उडीद, मका यांसह विविध पिके रोगराईने वाया गेल्याने तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांनाही शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विक्रम पाटील यांनी केली. तसा ठरावही करण्यात आला.

चौकट

पॅसेंजर सुरू करा : धामणे

काेरोनाने रेल्वे पॅसेजर गाड्या बंद आहेत. कोरोनाची स्थिती सुधारल्याने नोकरदार, शेतकरी व चाकरमान्यांचे होणारे हाल थांबविण्यासाठी शासनाने पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी काकासाहेब धामणे यांनी केली.

चौकट

याच बँकेची अट का : कांबळे

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी एका खासगी बँकेत वर्ग करण्याची शासनाने सक्ती केली आहे. तालुक्यात या बँकेचा विस्तार नसल्याने स्थानिक पातळीवरील बँकांत व्यवहार करणे सोयीचे असताना तालुक्यात विस्तार नसलेल्या या बँकेचीच सक्ती का? असा प्रश्न करुन ग्रामपंचायतींना अडचणीची ठरणारी ही अट रद्द करण्याची मागणी कृष्णदेव कांबळे यांनी केली.