शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
3
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
4
४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं म्हणत विरोधकांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
5
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
6
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
7
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
8
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
9
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
10
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
11
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
12
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
13
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
14
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
15
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
16
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
17
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
18
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
19
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  

चांदोली धरण परिसरासह सुरक्षा रक्षकही असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम ...

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे राज्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील सरहद्दीवर ३६७.१७ चौरस किलोमीटरचे क्षेत्र असणारे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. अभयारण्यात विविध जातींचे प्राणी, पक्षी, कीटक, विविध प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे जीव यांचे अस्तित्व आहे. याच अभयारण्यातील गवे, रानडुकरांकडून तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे, मणदूर, बेरडेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी परिसर येथील व शाहुवाडी तालुक्यातील उखळू, शितूर, खेडे, शिराळे वारूण या परिसरातील ऊस, भात पिकांचे नुकसान होत आहे. अभयारण्यातील बिबट्यांकडूनही वारंवार हल्ले होत आहेत.सध्या धरण ९१.८१ टक्के भरले आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवाँधार पाऊस सुरू असतो. त्यामुळे धरण परिसरात सुरक्षा व्यवस्था काटेकोर असणे आवश्यक असते, पण धरणाच्या भिंतीवरील पथदिवे कायम बंदच असतात. गेल्या वर्षभरापासून तक्रारी करूनही वरिष्ठांनी दखल घेतली नाही. धरणाच्या गेटजवळील विद्युतपुरवठा प्रशासनाने वीज बिल न भरल्याने वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे परिसर नेहमीच अंधारात असतो. याचा फायदा हिंस्र प्राणी घेतात आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. अंधाराचे साम्राज्य असल्याने हेच प्राणी धरणाच्या सुरक्षा कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला करू शकतात.गुरुवारी पहाटे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. चारच दिवसांपूर्वी धरणाच्या जलाशयातील महाकाय मगर धरणाच्या भिंतीवर आली होती. त्यामुळे धरणावरील कर्मचारी व पोलिस यांच्यात भीतीचे वातावरण आहे. भीतीच्या छायेखालीच ते धरणाची सुरक्षा करतात.