शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चांदोली धरण परिसरासह सुरक्षा रक्षकही असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम ...

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे राज्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील सरहद्दीवर ३६७.१७ चौरस किलोमीटरचे क्षेत्र असणारे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. अभयारण्यात विविध जातींचे प्राणी, पक्षी, कीटक, विविध प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे जीव यांचे अस्तित्व आहे. याच अभयारण्यातील गवे, रानडुकरांकडून तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे, मणदूर, बेरडेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी परिसर येथील व शाहुवाडी तालुक्यातील उखळू, शितूर, खेडे, शिराळे वारूण या परिसरातील ऊस, भात पिकांचे नुकसान होत आहे. अभयारण्यातील बिबट्यांकडूनही वारंवार हल्ले होत आहेत.सध्या धरण ९१.८१ टक्के भरले आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवाँधार पाऊस सुरू असतो. त्यामुळे धरण परिसरात सुरक्षा व्यवस्था काटेकोर असणे आवश्यक असते, पण धरणाच्या भिंतीवरील पथदिवे कायम बंदच असतात. गेल्या वर्षभरापासून तक्रारी करूनही वरिष्ठांनी दखल घेतली नाही. धरणाच्या गेटजवळील विद्युतपुरवठा प्रशासनाने वीज बिल न भरल्याने वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे परिसर नेहमीच अंधारात असतो. याचा फायदा हिंस्र प्राणी घेतात आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. अंधाराचे साम्राज्य असल्याने हेच प्राणी धरणाच्या सुरक्षा कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला करू शकतात.गुरुवारी पहाटे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. चारच दिवसांपूर्वी धरणाच्या जलाशयातील महाकाय मगर धरणाच्या भिंतीवर आली होती. त्यामुळे धरणावरील कर्मचारी व पोलिस यांच्यात भीतीचे वातावरण आहे. भीतीच्या छायेखालीच ते धरणाची सुरक्षा करतात.