शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

चांदोली धरण परिसरासह सुरक्षा रक्षकही असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम ...

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे राज्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील सरहद्दीवर ३६७.१७ चौरस किलोमीटरचे क्षेत्र असणारे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. अभयारण्यात विविध जातींचे प्राणी, पक्षी, कीटक, विविध प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे जीव यांचे अस्तित्व आहे. याच अभयारण्यातील गवे, रानडुकरांकडून तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे, मणदूर, बेरडेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी परिसर येथील व शाहुवाडी तालुक्यातील उखळू, शितूर, खेडे, शिराळे वारूण या परिसरातील ऊस, भात पिकांचे नुकसान होत आहे. अभयारण्यातील बिबट्यांकडूनही वारंवार हल्ले होत आहेत.सध्या धरण ९१.८१ टक्के भरले आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवाँधार पाऊस सुरू असतो. त्यामुळे धरण परिसरात सुरक्षा व्यवस्था काटेकोर असणे आवश्यक असते, पण धरणाच्या भिंतीवरील पथदिवे कायम बंदच असतात. गेल्या वर्षभरापासून तक्रारी करूनही वरिष्ठांनी दखल घेतली नाही. धरणाच्या गेटजवळील विद्युतपुरवठा प्रशासनाने वीज बिल न भरल्याने वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे परिसर नेहमीच अंधारात असतो. याचा फायदा हिंस्र प्राणी घेतात आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. अंधाराचे साम्राज्य असल्याने हेच प्राणी धरणाच्या सुरक्षा कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला करू शकतात.गुरुवारी पहाटे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. चारच दिवसांपूर्वी धरणाच्या जलाशयातील महाकाय मगर धरणाच्या भिंतीवर आली होती. त्यामुळे धरणावरील कर्मचारी व पोलिस यांच्यात भीतीचे वातावरण आहे. भीतीच्या छायेखालीच ते धरणाची सुरक्षा करतात.