शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सांगली जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांची धुराडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:38 IST

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी दि. २४ मार्चअखेर ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ ...

ठळक मुद्देमार्चअखेर गाळप थांबणार: ९९ लाख क्विंटल साखर उत्पादन

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी दि. २४ मार्चअखेर ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, १२.३६ टक्के साखर उतारा मिळाला आहे. यावर्षी एक कोटी क्विंटलच्या पुढे साखरेचे उत्पादन होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. येत्या चार दिवसात उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी २४ एप्रिल २०१४ अखेरच्या गळीत हंगामात ७१ लाख ६१ हजार ३५९ टन उसाचे गाळप करून ८८ लाख १३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. त्यावेळी १२़.३१ टक्के सरासरी साखरेचा उतारा मिळाला होता. मागील पाच वर्षात साखर कारखानदारांनी आधुनिकता आणून गाळप क्षमता वाढविली आहे. २४ मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. उसाचा सरासरी १२.३६ टक्के उतारा आहे.

चार कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहेत. या महिन्याच्या कालावधित ऊस गाळपाची आकडेवारी ८३ लाख टनापर्यंत जाणार आहे. साखरेचेही जिल्ह्यात विक्रमी उत्पादन होणार आहे. प्रथमच एक कोटी क्विंटल साखरेचा टप्पा निश्चित पार होणार आहे. साखरेची आकडेवारी लक्षात घेऊन कारखानदारांना साखर विक्रीचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात जादा साखरेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.बंद झालेले : कारखानेविश्वासराव नाईक (चिखली, ता. शिराळा), हुतात्मा (वाळवा), माणगंगा (आटपाडी), महांकाली (कवठेमहांकाळ), राजारामबापू, वाटेगाव युनिट, सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सर्वोदय (कारंदवाडी, ता. वाळवा), मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), यशवंत शुगर (नागेवाडी, ता. खानापूर), उदगिरी शुगर (बामणी-पारे, ता. खानापूर), सद्गुरू श्री श्री शुगर (राजेवाडी, ता. आटपाडी) या कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. उर्वरित कारखान्यांचे गळीत चार दिवसात बंद होणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने