शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांची धुराडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:38 IST

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी दि. २४ मार्चअखेर ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ ...

ठळक मुद्देमार्चअखेर गाळप थांबणार: ९९ लाख क्विंटल साखर उत्पादन

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी दि. २४ मार्चअखेर ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, १२.३६ टक्के साखर उतारा मिळाला आहे. यावर्षी एक कोटी क्विंटलच्या पुढे साखरेचे उत्पादन होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. येत्या चार दिवसात उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी २४ एप्रिल २०१४ अखेरच्या गळीत हंगामात ७१ लाख ६१ हजार ३५९ टन उसाचे गाळप करून ८८ लाख १३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. त्यावेळी १२़.३१ टक्के सरासरी साखरेचा उतारा मिळाला होता. मागील पाच वर्षात साखर कारखानदारांनी आधुनिकता आणून गाळप क्षमता वाढविली आहे. २४ मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. उसाचा सरासरी १२.३६ टक्के उतारा आहे.

चार कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहेत. या महिन्याच्या कालावधित ऊस गाळपाची आकडेवारी ८३ लाख टनापर्यंत जाणार आहे. साखरेचेही जिल्ह्यात विक्रमी उत्पादन होणार आहे. प्रथमच एक कोटी क्विंटल साखरेचा टप्पा निश्चित पार होणार आहे. साखरेची आकडेवारी लक्षात घेऊन कारखानदारांना साखर विक्रीचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात जादा साखरेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.बंद झालेले : कारखानेविश्वासराव नाईक (चिखली, ता. शिराळा), हुतात्मा (वाळवा), माणगंगा (आटपाडी), महांकाली (कवठेमहांकाळ), राजारामबापू, वाटेगाव युनिट, सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सर्वोदय (कारंदवाडी, ता. वाळवा), मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), यशवंत शुगर (नागेवाडी, ता. खानापूर), उदगिरी शुगर (बामणी-पारे, ता. खानापूर), सद्गुरू श्री श्री शुगर (राजेवाडी, ता. आटपाडी) या कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. उर्वरित कारखान्यांचे गळीत चार दिवसात बंद होणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने