शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सांगली जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांची धुराडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:38 IST

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी दि. २४ मार्चअखेर ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ ...

ठळक मुद्देमार्चअखेर गाळप थांबणार: ९९ लाख क्विंटल साखर उत्पादन

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी दि. २४ मार्चअखेर ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, १२.३६ टक्के साखर उतारा मिळाला आहे. यावर्षी एक कोटी क्विंटलच्या पुढे साखरेचे उत्पादन होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. येत्या चार दिवसात उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी २४ एप्रिल २०१४ अखेरच्या गळीत हंगामात ७१ लाख ६१ हजार ३५९ टन उसाचे गाळप करून ८८ लाख १३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. त्यावेळी १२़.३१ टक्के सरासरी साखरेचा उतारा मिळाला होता. मागील पाच वर्षात साखर कारखानदारांनी आधुनिकता आणून गाळप क्षमता वाढविली आहे. २४ मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. उसाचा सरासरी १२.३६ टक्के उतारा आहे.

चार कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहेत. या महिन्याच्या कालावधित ऊस गाळपाची आकडेवारी ८३ लाख टनापर्यंत जाणार आहे. साखरेचेही जिल्ह्यात विक्रमी उत्पादन होणार आहे. प्रथमच एक कोटी क्विंटल साखरेचा टप्पा निश्चित पार होणार आहे. साखरेची आकडेवारी लक्षात घेऊन कारखानदारांना साखर विक्रीचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात जादा साखरेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.बंद झालेले : कारखानेविश्वासराव नाईक (चिखली, ता. शिराळा), हुतात्मा (वाळवा), माणगंगा (आटपाडी), महांकाली (कवठेमहांकाळ), राजारामबापू, वाटेगाव युनिट, सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सर्वोदय (कारंदवाडी, ता. वाळवा), मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), यशवंत शुगर (नागेवाडी, ता. खानापूर), उदगिरी शुगर (बामणी-पारे, ता. खानापूर), सद्गुरू श्री श्री शुगर (राजेवाडी, ता. आटपाडी) या कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. उर्वरित कारखान्यांचे गळीत चार दिवसात बंद होणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने