शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

शिष्यवृत्तीच्या पेपर तपासणीत गोलमाल

By admin | Updated: May 8, 2016 00:46 IST

कडेगावात पालकांची तक्रार : गुणवंत विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप

प्रताप महाडिक ल्ल कडेगावराज्य शासनाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रद्द केल्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली. या परीक्षेच्या पेपर तपासणीत गोलमाल झाल्यामुळे अनेक गुणवंत व प्रथम क्रमांकाचे दावेदार असलेले विद्यार्थीही गुणवत्ता यादीत आलेले नाहीत. याबाबतची तक्रारही संबंधित मुलांच्या पालकांनी कडेगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.जिल्हास्तरावर झालेल्या या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी १८ विद्यार्थी कडेगाव तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची दावेदार म्हणून ज्या मुलीची चर्चा होती, त्या केतकी सतीश कुंभार या शिवणी शाळेच्या विद्यार्थिनीला मराठीत १०० पैकी ९८, गणित १०० पैकी ९८ गुण मिळाले आहेत. परंतु बुद्धिमत्ता चाचणीत १०० पैकी ३६ गुण मिळाले आहेत. बुद्धिमत्ता चाचणीतही १०० पैकी १०० गुण मिळतील, असा केतकीला आत्मविश्वास आहे. यापूर्वी तिसरीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता.कडेगाव शाळेची विद्यार्थिनी सई प्रदीप महाडिक हिनेही तिसरीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविला होता. तिला आता या परीक्षेत मराठीत ९८ गुण मिळाले आहेत. परंतु गणितात ६६, तर बुद्धिमत्ता चाचणीत ६० गुण मिळाले आहेत. तिला गणित विषयात ९८, तर बुद्धिमत्ता चाचणीत १०० गुण मिळतील, असे नमुना उत्तरपत्रिकावरून स्पष्ट होत आहे.केतकी व सईप्रमाणेच विश्वजित शिवनंदन पवार या कडेगावच्या विद्यार्थ्याच्या गुणातही गोलमाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय तालुक्यातील अनेक मुलांच्या तसेच पालकांच्या तक्रारी कडेगावचे गटशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांच्याकडे आल्या आहेत. याबाबत उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठीचे प्रस्ताव तसेच पालकांचे तक्रार अर्ज शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत, असे उकिर्डे यांनी सांगितले. पालकांच्या तक्रारींची दखल घेऊ - नीशादेवी वाघमोडे४ही परीक्षा फक्त सांगली जिल्हास्तरावर घेतली होती. निकालावरून काही पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. उत्तरपत्रिका संगणकाच्या साहाय्याने (ओएमआर) पद्धतीने तपसल्या आहेत. तरीही पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित मुलांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करणार आहे, असे शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी सांगितले.४शिक्षण विभागाने घेतलेल्या परीक्षेच्या निकालावरून तक्रारी वाढत आहेत. तक्रार आलेल्या मुलांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी. यामध्ये कोणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे जिल्हा परिषदेतील कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी सांगितले.