शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सत्तानाट्याने सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 14:35 IST

कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत.

ठळक मुद्देदुसरीकडे भाजप, शिवसेना व काँग्रेसचे आमदारही मुंबईतच आहेत.

सांगली : राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींमुळे सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबईतच अडकले असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही तिथेच ठाण मांडले आहे. आमदारांना सांभाळताना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजकीय हालचालींवर नजर ठेवून सतत त्याची माहिती पक्षाला कळविण्याची सूचना दिली आहे.

 

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठपैकी तीन जागा जिंकून राष्टÑवादीने क्रमांक एकची खुर्ची भाजपकडून ताब्यात घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचा आत्मविश्वास दुणावला आहे. अशा परिस्थितीत पक्षातील राज्यस्तरीय बंडामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादी हादरून गेली आहे. तरीही पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे असल्याने व जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत असल्याने येथील राष्टÑवादी एकसंधपणे शरद पवारांच्या बाजूने ठाम आहे. राष्टÑवादीच्या तिन्ही आमदारांना एकत्रित ठेवण्यात आले असून त्यात जिल्ह्यातील तिन्ही आमदारांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारीही मुंबईतच ठाण मांडून आहेत. राजकीय हालचालींवर त्यांना नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे भाजप, शिवसेना व काँग्रेसचे आमदारही मुंबईतच आहेत. प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या प्रमुखांना वरिष्ठांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.राज्यातील राजकीय घडामोडींना जसा वेग येईल, तसे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. येथील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली