शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सत्तानाट्याने सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 14:35 IST

कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत.

ठळक मुद्देदुसरीकडे भाजप, शिवसेना व काँग्रेसचे आमदारही मुंबईतच आहेत.

सांगली : राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींमुळे सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबईतच अडकले असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही तिथेच ठाण मांडले आहे. आमदारांना सांभाळताना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजकीय हालचालींवर नजर ठेवून सतत त्याची माहिती पक्षाला कळविण्याची सूचना दिली आहे.

 

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठपैकी तीन जागा जिंकून राष्टÑवादीने क्रमांक एकची खुर्ची भाजपकडून ताब्यात घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचा आत्मविश्वास दुणावला आहे. अशा परिस्थितीत पक्षातील राज्यस्तरीय बंडामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादी हादरून गेली आहे. तरीही पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे असल्याने व जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत असल्याने येथील राष्टÑवादी एकसंधपणे शरद पवारांच्या बाजूने ठाम आहे. राष्टÑवादीच्या तिन्ही आमदारांना एकत्रित ठेवण्यात आले असून त्यात जिल्ह्यातील तिन्ही आमदारांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारीही मुंबईतच ठाण मांडून आहेत. राजकीय हालचालींवर त्यांना नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे भाजप, शिवसेना व काँग्रेसचे आमदारही मुंबईतच आहेत. प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या प्रमुखांना वरिष्ठांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.राज्यातील राजकीय घडामोडींना जसा वेग येईल, तसे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. येथील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली