शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सत्तानाट्याने सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 14:35 IST

कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत.

ठळक मुद्देदुसरीकडे भाजप, शिवसेना व काँग्रेसचे आमदारही मुंबईतच आहेत.

सांगली : राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींमुळे सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबईतच अडकले असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही तिथेच ठाण मांडले आहे. आमदारांना सांभाळताना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजकीय हालचालींवर नजर ठेवून सतत त्याची माहिती पक्षाला कळविण्याची सूचना दिली आहे.

 

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठपैकी तीन जागा जिंकून राष्टÑवादीने क्रमांक एकची खुर्ची भाजपकडून ताब्यात घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचा आत्मविश्वास दुणावला आहे. अशा परिस्थितीत पक्षातील राज्यस्तरीय बंडामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादी हादरून गेली आहे. तरीही पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे असल्याने व जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत असल्याने येथील राष्टÑवादी एकसंधपणे शरद पवारांच्या बाजूने ठाम आहे. राष्टÑवादीच्या तिन्ही आमदारांना एकत्रित ठेवण्यात आले असून त्यात जिल्ह्यातील तिन्ही आमदारांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारीही मुंबईतच ठाण मांडून आहेत. राजकीय हालचालींवर त्यांना नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे भाजप, शिवसेना व काँग्रेसचे आमदारही मुंबईतच आहेत. प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या प्रमुखांना वरिष्ठांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.राज्यातील राजकीय घडामोडींना जसा वेग येईल, तसे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. येथील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली