शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

उपसरपंच निवडीत सरपंचांना मताचा अधिकार : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:47 IST

विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने दिला असल्याची माहिती अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना ...

विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने दिला असल्याची माहिती अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई व शिंदेवाडी (घोरपडी) येथील सरपंच आक्काताई भोसले यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिल्याचेही अ‍ॅड. मुळीक यावेळी म्हणाले.ते म्हणाले, महाराष्टÑ शासनाने ग्रामपंचायत कायद्यात दुरूस्ती करून सरपंचाची थेट निवड करण्याचा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशानुसार निवडून आलेला सरपंच पदसिध्द सदस्य असल्याने आणि उपसरपंचांच्या निवडणुकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल, अशी तरतूद होती.

या तरतुदीच्या अनुषंगाने उपसरपंच निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसºया व निर्णायक मताचा वापर करता येईल किंवा कसे याबाबत शासनाकडे विविध ठिकाणांहून मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर शासनाने दि. १ नोव्हेंबररोजी उपसरपंच निवडणुकीच्या फेरीमध्ये सरपंचांना मतदानामध्ये भाग घेता येणार नाही. मात्र या फेरीतील उपसरपंचांच्या निवडणुकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, असे कक्ष अधिकाºयांनी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कळविले होते. त्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले होते.

त्यामुळे शासनाच्या दि. १ नोव्हेंबरच्या परिपत्रकास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई व शिंदेवाडी (घोरपडी) येथील सरपंच आक्काताई भोसले यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवार, दि. १५ जून रोजी निर्णय देताना शासनाचे परिपत्रक रद्द करून सरपंचांना उपसरपंच निवडीत सदस्य म्हणून एक आणि समसमान मते मिळाल्यास निर्णायक एक मत देण्याचा अधिकार दिला असल्याचे अ‍ॅड. मुळीक यांनी सांगितले.

बाबासाहेब मुळीक यांनी सांगितले...खानापूर तालुक्यातील कमळापूर, बलवडी (खा.) मादळमुठी, मिरज तालुक्यातील वड्डी, जत तालुक्यातील बेळुंखी, रामपूर, देवनाळ, साळमळगेवाडी, रेवनाळ या ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीला याचिकेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच सांगलीच्या जिल्हाधिकाºयांकडे तासगाव तालुक्यातील पुणदी, वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष व काळमवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (हिंगणगाव) येथील उपसरपंच निवडीबाबतच्या याचिका प्रलंबित आहेत. या सर्व याचिकांवर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची माहिती अ‍ॅड. मुळीक यांनी दिली.

 

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय