शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

शांतिनिकेतनमधून पुन्हा ‘आबा’ निर्माण व्हावेत

By admin | Updated: February 19, 2015 00:21 IST

आदरांजली सभा : माजी विद्यार्थ्यांच्या भावना

सांगली : शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे प्रणेते प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन गृहमंत्रीपदी पोहोचलेल्या आर. आर. पाटील यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वात जास्त हानी शांतिनिकेतनची झाली आहे. त्यांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर, भविष्यात याच विद्यापीठातून संस्कारांची शिदोरी घेऊन अनेक ‘आबा’ निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षा अनेक माजी विद्यार्थ्यांनी आज (बुधवारी) व्यक्त केली. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या सर्व शाखा तसेच शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराच्यावतीने आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आबांच्या आठवणीने अनेकांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. संगीता पाटील म्हणाल्या की, आबांना भेटायला मुंबईतील लीलावतीमध्ये गेल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून केलेले हास्य मी कधीही विसरू शकणार नाही. गुरूंची पंचायत राजची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष राबविली. आबांना श्रध्दांजली वाहायची असेल, तर युवक पिढीने व्यसनांपासून लांब राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. माजी विद्यार्थी परिवाराचे शौकत मुलाणी म्हणाले की, आबांच्या जाण्याने तासगाव-कवठेमहांकाळ तालुका बरीच वर्षे मागे गेला आहे. सध्याच्या युवक पिढीने आबांचे गुण आत्मसात करावेत तसेच शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांमधून आणखी एखादे ‘आबा’ निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मराठा समाजाचे तानाजीराव मोरे यांनी केले. हीच भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे उपसंचालक बी. आर. थोरात, डॉ. अविनाश पाटील, उत्तम माने, सनतकुमार आरवाडे, एकनाथ जाधव, एम. के. आंबोळे, शामराव जगताप, कुलाब्याचे माजी आमदार अशोक धात्रक यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुरू-शिष्याचे नाते...नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील म्हणाले की, आबा आणि शांतिनिकेतन यांचे अतूट नाते होते. ज्या उदात्त विचारांनी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सरांनी आबांना घडविले, तेच विचार कृतीत उतरविण्याचे कार्य त्यांनी केले. आबांच्या जाण्याने शिष्य गुरूच्या कुशीत विसावला.