शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

शांतिनिकेतनमधून पुन्हा ‘आबा’ निर्माण व्हावेत

By admin | Updated: February 19, 2015 00:21 IST

आदरांजली सभा : माजी विद्यार्थ्यांच्या भावना

सांगली : शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे प्रणेते प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन गृहमंत्रीपदी पोहोचलेल्या आर. आर. पाटील यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वात जास्त हानी शांतिनिकेतनची झाली आहे. त्यांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर, भविष्यात याच विद्यापीठातून संस्कारांची शिदोरी घेऊन अनेक ‘आबा’ निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षा अनेक माजी विद्यार्थ्यांनी आज (बुधवारी) व्यक्त केली. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या सर्व शाखा तसेच शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराच्यावतीने आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आबांच्या आठवणीने अनेकांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. संगीता पाटील म्हणाल्या की, आबांना भेटायला मुंबईतील लीलावतीमध्ये गेल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून केलेले हास्य मी कधीही विसरू शकणार नाही. गुरूंची पंचायत राजची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष राबविली. आबांना श्रध्दांजली वाहायची असेल, तर युवक पिढीने व्यसनांपासून लांब राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. माजी विद्यार्थी परिवाराचे शौकत मुलाणी म्हणाले की, आबांच्या जाण्याने तासगाव-कवठेमहांकाळ तालुका बरीच वर्षे मागे गेला आहे. सध्याच्या युवक पिढीने आबांचे गुण आत्मसात करावेत तसेच शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांमधून आणखी एखादे ‘आबा’ निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मराठा समाजाचे तानाजीराव मोरे यांनी केले. हीच भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे उपसंचालक बी. आर. थोरात, डॉ. अविनाश पाटील, उत्तम माने, सनतकुमार आरवाडे, एकनाथ जाधव, एम. के. आंबोळे, शामराव जगताप, कुलाब्याचे माजी आमदार अशोक धात्रक यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुरू-शिष्याचे नाते...नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील म्हणाले की, आबा आणि शांतिनिकेतन यांचे अतूट नाते होते. ज्या उदात्त विचारांनी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सरांनी आबांना घडविले, तेच विचार कृतीत उतरविण्याचे कार्य त्यांनी केले. आबांच्या जाण्याने शिष्य गुरूच्या कुशीत विसावला.