शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कवठेमहांकाळला संजयकाका यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात नवीन राजकीय वादाची ठिणगी पडली असून, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडीत खासदार संजयकाका पाटील यांचा घात ...

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात नवीन राजकीय वादाची ठिणगी पडली असून, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडीत खासदार संजयकाका पाटील यांचा घात झाला आहे. राष्ट्रवादीचा सगरे गट आणि अजितराव घोरपडे गटाने एकत्र येत उपनगराध्यक्ष पद खेचून घेतले. त्यामुळे सगरे-घोरपडे हे नवीन समीकरण उदयास आले आहे.

तासगाव, कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय सामंजस्य करार झाला. तो दोन्ही निवडणुकीत इमानेइतबारे पाळला. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती निवडीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी पंचायत समितीमध्ये भाजपचा केवळ एक सदस्य असताना विकास हाक्के यांना सभापती केले. यामुळे राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.

महिन्यापूर्वी काका गटाच्या उपनगराध्यक्षा सिंधुताई गावडे यांनी पदाचा राजीनामा दिला. विशाल वाघमारे यांना बिनविरोध करण्यासाठी खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना व नगरसेवकांना सांगितले. त्यानुसार बुधवारी निवडणूक होती.

परंतु मागील आठवड्यात सगरे आणि घोरपडे गटाच्या एकीची राजकीय खिचडी शिजली आणि संजयकाका यांचे सगळेच फासे फिरले. निवडणुकीवेळी आठ विरुद्ध सात मताने सगरे गटाचे अय्याज मुल्ला उपनगराध्यक्ष झाले.

राष्ट्रवादीचे गजानन कोठावळे आणि घोरपडे गटाचे सुनील माळी यांनी खासदार गटाला मदत केली, तर खासदार गटाच्या वैशाली बाळासाहेब पाटील यांनी सगरे गटाचे अय्याज मुल्ला यांना मदत केली. खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादी, सगरे गट यांचे राजकीय सख्य होते. सगरे गट हा राष्ट्रवादीमधीलच राजकीय गट आहे. हा सगरे गट राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील तसेच सुरेश पाटील यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय विरोधात जाऊन घेत नाहीत. असे असताना खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात सगरे गटाने कुणाच्या बळावर दंड थोपटले, याची चर्चा जोरात सुरू आहे.

चाैकट

घाव कुणाचा होता

घोरपडे गटाने मात्र राष्ट्रवादीच्या आणि सगरे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवत संजयकाकांवर डाव साधला आहे. या निवडीत संजयकाकांना धक्का बसला असून, राजकीय हत्याराविना घायाळ झालो मी, तो घाव कुणाचा होता, राजकीय खेळाविनाच हरलो मी, तो डाव कुणाचा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे.