शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेतर्फे सांगलीत दूध वाटप आंदोलन : दूध उत्पादकांची लूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:52 IST

सांगली : दुधाला सरकारने प्रति लिटर २७ रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’ या आशयाच्या घोेषणा यावेळी

ठळक मुद्देसरकारने प्रतिलिटर २७ रूपये दर देण्याची मागणी

सांगली : दुधाला सरकारने प्रति लिटर २७ रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’ या आशयाच्या घोेषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्ह्यातही काही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आल.शेतकऱ्यांना लुटण्यापेक्षा फुकटच दूध घ्या, यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ३ मे ते ९ मेअखेर हे आंदोलन होणार असून ठिकठिकाणी दूध वाटप केले जाणार आहे. याची सुरूवात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाने झाली.आंतरराष्टÑीय दूध पावडरचे दर कोसळल्याचे सांगत, राज्यात दुधाचा महापूर असल्याचे सांगण्यात येत आहे. एक टॅँकर दुधाचे तीन टॅँकर दूध तयार केले जात आहे. चांगल्या दर्जाच्या दुधाला १७ रूपये दर देऊन तेच दूध ५० रूपये लिटरने ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे शेतकºयांची लूट सरकारकडून सुरू असून ती थांबविण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली.यावेळी उमेश देशमुख, सुदर्शन घेरडे, जयकुमार सकळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोकोसांंगली : सरकारच्यावतीने कर्जमाफीची घोषणा करताना गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रूपये दर देण्याची घोषणा केली होती. त्यावर अभ्यासासाठी समिती नेमण्यात आली. मात्र, अजूनही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने दुधाची दरवाढ करावी, या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील शिवशंभो चौकात झालेल्या या आंदोलनात मौजे डिग्रज येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे की, सरकारने दुधाची दरवाढ करून शेतकºयांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अभ्यास समिती नेमूनही त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वत:ला शेतकºयांचे तारणहार समजतात. मात्र, ते मंत्री झाल्यापासून त्यांनीही दूध उत्पादकांना दिलासा दिलेला नाही. सध्या गोळी पेंड, चारा, मिनरल मिक्श्चर, मजुरी यासह इतर खर्च वाढत चालल्याने दूध उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे तातडीने दूध दरवाढ करावी, अन्यथा पुढील काळात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे वाहन अडविण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस सुनील फराटे, समीर पाटील, विजय लांडे, अश्विनकुमार बिरनाळे, सनी आवटी, सुहास गाढवे, महावीर चौगुले, वसंत भिसे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Sangliसांगलीmilkदूध