शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सांगलीच्या राष्टÑवादीतील वाद वरिष्ठ नेत्यांपर्यंत- संघर्ष टोकाला : दोन्ही गट आरोपांवर ठाम,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:50 IST

सांगली : महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच सांगली महापालिका क्षेत्रात राष्टÑवादीअंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांवर कुरघोड्या करीत दोन्ही गट आक्रमक होऊ पाहात आहेत. याबाबतची कल्पना काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनाही दिली आहे.सांगली जिल्हा राष्टÑवादीला गेल्या चार वर्षांपासून वादाचे ग्रहण लागले आहे. लोकसभा, विधानसभा ...

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीपूर्वीच पक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढली

सांगली : महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच सांगली महापालिका क्षेत्रात राष्टÑवादीअंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांवर कुरघोड्या करीत दोन्ही गट आक्रमक होऊ पाहात आहेत. याबाबतची कल्पना काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनाही दिली आहे.

सांगली जिल्हा राष्टÑवादीला गेल्या चार वर्षांपासून वादाचे ग्रहण लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप व शिवसेनेचा आसरा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचे अस्तित्व धोक्यात आले.

पक्षांतर्गत वाद, नाराजी यावर वेळीच तोडगा काढला गेला नसल्याने या गोष्टी घडत गेल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाची वाईट स्थिती होत असताना, महापालिका क्षेत्रातील ताकद अबाधित राहिली, मात्र गेल्या दोन वर्षापासून महापालिका क्षेत्रातही पक्षांतर्गत वादाने तोंड वर काढले. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात दोन गट पडले आहेत.

बजाज यांच्या कार्यपद्धतीबद्दल कमलाकर पाटील गटाला आक्षेप आहेत, तर कमलाकर पाटील यांचा गट पक्षविरोधी कृती करीत असल्याचे बजाज समर्थकांचे मत आहे. दोन्हीही गट एकमेकांच्या विरोधात उघडपणे संघर्ष करताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या महाआरोग्य शिबिराला कमलाकर पाटील यांच्या गटातील बहुतांश कार्यकर्ते, नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.रुसवाफुगवी कायम...युवक राष्टÑवादी व अन्य सेलमधील पदांच्या वाटपावरूनही दोन्ही गटात वाद निर्माण झाले होते. पक्षात वर्चस्ववादाची लढाई दोन्ही गटात सुरू आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्या गटाचे वर्चस्व अधिक राहणार, हा चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी स्थापन करण्यात येणाºया कमिटीतही वर्णी लागावी म्हणून काहींची धडपड सुरू आहे.