शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

सांगलीत नागरी वस्तीत पाणी शिरले

By admin | Updated: August 7, 2016 23:17 IST

२० कुटुंबांचे स्थलांतर : शामरावनगर पाण्याखाली, रस्त्यावर गुडघाभर पाणी

सांगली : सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, रविवारी हे पाणी नागरी वस्तीत शिरले आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, दत्तनगर, कर्नाळ रस्ता या परिसरातील २० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शामरावनगरला तर पावसाच्या पाण्याने वेढाच दिला आहे. सांगलीत सकाळी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ३४ फुटांवर गेली होती. शेरीनाल्यातून नदीचे पाणी नागरी वस्तीत शिरले. जामवाडी परिसरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील पाच घरांच्या उंबऱ्यांना पाणी लागले होते. तेथील राहणाऱ्या कुटुंबांनी स्वत:हूनच स्थलांतर केले. तसेच सायंकाळी या परिसरातील दत्तनगरमध्ये पाणी आल्याने तेथील १२ कुटुंबाना महापालिकेने सुरक्षितस्थळी हलविले. शहराला पुराचा धोका वाढू लागला आहे. कर्नाळ रस्त्याला पाणी लागले असून तेथील बांबू विक्रेते, गॅरेजवाल्यांनी आपले साहित्य हलविण्यास सुरूवात केली होती. पावसाचा जोर नसला तरी, रात्रीपर्यंत कर्नाळ रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सकाळी महापालिकेत आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त सुनील पवार, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आर. पी. जाधव, अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी दुधाळ, नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. आयुक्तांच्या सूचनेनंतर महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र रिसाला रस्त्यावरील अग्निशमन केंद्रातून गवळी गल्लीतील शाळा क्रमांक पाचमध्ये हलविण्यात आले. पालिका हतबल, नागरिक सरसावले शामरावनगर, आकाशवाणी, कालिकानगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचे तळे साचले आहे. महापालिकेचे अधिकारी या भागाला भेट देतात, पण पाण्याच्या निचऱ्यावर उपाययोजना करण्याऐवजी नागरिकांनाच दूषणे देऊन जातात. महापालिका हतबल झाल्याने अखेर नागरिकच पाण्याचा निचरा करण्यासाठी सरसावले आहेत. कालिकानगर परिसरातील दोन रस्त्यांवर नागरिकांनी लोकवर्गणी काढून पाईप टाकल्या. जेसीबीच्या साहाय्याने पाईप टाकून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न चालविला होता. आयुक्तांपासून अनेक अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा केला, पण आश्वासनाव्यतिरिक्त काहीच पदरात पडले नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली.