शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
7
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
8
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
9
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
10
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
11
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
12
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
13
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
14
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
15
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
16
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
17
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
18
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
19
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
20
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

टेंभू, ताकारीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा सांगलीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:30 IST

सांगली : टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांच्या थकीत बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज तोडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकºयांनी सोमवारी रस्त्यावर येत सांगलीत सोमवारी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पाणीपट्टीसाठी कारखान्यांनी शेतकºयांचे कापून घेतलेले पैसे भरुन तात्काळ टेंभू ताकारी योजना ...

सांगली : टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांच्या थकीत बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज तोडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकºयांनी सोमवारी रस्त्यावर येत सांगलीत सोमवारी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पाणीपट्टीसाठी कारखान्यांनी शेतकºयांचे कापून घेतलेले पैसे भरुन तात्काळ टेंभू ताकारी योजना सुरू करण्याची मागणी केली.सांगली येथील पाटबंधारे कार्यालयावर टेंभू, ताकारी लाभक्षेत्रातील आटपाडी, सांगोला, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेकडो शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. यावेळी डॉ. पाटणकर यांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे अधिकारी, टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूस्कर, उपअभियंता लालासाहेब मोरे, जयंत गलगले आदींशी चर्चा केली. मागील काही महिने पाऊस सुरू होता. पावसामुळे पिकांना पाण्याची गरज भासली नाही. गत आठवड्यापासून पावसाची उघडीप आहे. जमिनीतील पाण्याचा ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. ऊसासह अन्य पिके सध्या जोमात आहेत. त्यामुळे त्यांना वेळेत पाण्याची गरज आहे. टेंभू आणि ताकारी योजनांच्या थकित बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज जोडणी तोडली आहे. सध्या अवर्षणग्रस्त लाभक्षेत्रातील पिकांना तातडीने पाणी देणे आवश्यक आहे. लाभक्षेत्रातील कारखान्यांनी शेतकºयांचे कापून घेतलेले पैसे वसूल करून वीज जोडणी तातडीने करण्यात यावी.आगाऊ पाणीपट्टी वीजबिल १९ टक्क्यामधून भरुन घेण्याबरोबरच साखर कारखान्यांनी संबंधित सभासदांसाठी आगाऊ पैसे भरले, तर हा प्रश्न तातडीने सुटणार आहे. यासाठी पाटबंधारे विभाग, कारखाने, जिल्हा प्रशासन यांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. शासनानेसुद्धा त्यांच्याकडे थकीत असलेली टंचाई निवारणाची रक्कम तातडीने दिलीच पाहिजे. यासाठी विलंब करणे म्हणजे शासनानेच राज्याचे उत्पादन घटविण्यासारखे आहे. कारण पाणी नसल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकºयांचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबतची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.पाटबंधारे विभागाकडून सर्व ती मदत केली जाईल, शेतकºयांनी पैसे भरून सहकार्य करावे, असे अधिकाºयांनी सांगितले, कारखान्यांकडून पैसे वसुलीसाठी जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली जाईल, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.यावेळी आनंदराव पाटील, बाळासाहेब यादव, मनोहर विभूते, अनिल विभूते उपस्थित होते.कारखाने-प्रशासनाची बैठक होणारटेंभू आणि ताकारी योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून मदत केली जाईल, परंतु शेतकºयांनी पैसे भरुन सहकार्य करावे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. कारखान्यांकडून पैसे वसुलीसाठी जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्याचे आश्वासनही अधिकाºयांनी दिल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.