शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

टेंभू, ताकारीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा सांगलीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:30 IST

सांगली : टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांच्या थकीत बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज तोडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकºयांनी सोमवारी रस्त्यावर येत सांगलीत सोमवारी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पाणीपट्टीसाठी कारखान्यांनी शेतकºयांचे कापून घेतलेले पैसे भरुन तात्काळ टेंभू ताकारी योजना ...

सांगली : टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांच्या थकीत बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज तोडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकºयांनी सोमवारी रस्त्यावर येत सांगलीत सोमवारी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पाणीपट्टीसाठी कारखान्यांनी शेतकºयांचे कापून घेतलेले पैसे भरुन तात्काळ टेंभू ताकारी योजना सुरू करण्याची मागणी केली.सांगली येथील पाटबंधारे कार्यालयावर टेंभू, ताकारी लाभक्षेत्रातील आटपाडी, सांगोला, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेकडो शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. यावेळी डॉ. पाटणकर यांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे अधिकारी, टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूस्कर, उपअभियंता लालासाहेब मोरे, जयंत गलगले आदींशी चर्चा केली. मागील काही महिने पाऊस सुरू होता. पावसामुळे पिकांना पाण्याची गरज भासली नाही. गत आठवड्यापासून पावसाची उघडीप आहे. जमिनीतील पाण्याचा ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. ऊसासह अन्य पिके सध्या जोमात आहेत. त्यामुळे त्यांना वेळेत पाण्याची गरज आहे. टेंभू आणि ताकारी योजनांच्या थकित बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज जोडणी तोडली आहे. सध्या अवर्षणग्रस्त लाभक्षेत्रातील पिकांना तातडीने पाणी देणे आवश्यक आहे. लाभक्षेत्रातील कारखान्यांनी शेतकºयांचे कापून घेतलेले पैसे वसूल करून वीज जोडणी तातडीने करण्यात यावी.आगाऊ पाणीपट्टी वीजबिल १९ टक्क्यामधून भरुन घेण्याबरोबरच साखर कारखान्यांनी संबंधित सभासदांसाठी आगाऊ पैसे भरले, तर हा प्रश्न तातडीने सुटणार आहे. यासाठी पाटबंधारे विभाग, कारखाने, जिल्हा प्रशासन यांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. शासनानेसुद्धा त्यांच्याकडे थकीत असलेली टंचाई निवारणाची रक्कम तातडीने दिलीच पाहिजे. यासाठी विलंब करणे म्हणजे शासनानेच राज्याचे उत्पादन घटविण्यासारखे आहे. कारण पाणी नसल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकºयांचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबतची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.पाटबंधारे विभागाकडून सर्व ती मदत केली जाईल, शेतकºयांनी पैसे भरून सहकार्य करावे, असे अधिकाºयांनी सांगितले, कारखान्यांकडून पैसे वसुलीसाठी जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली जाईल, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.यावेळी आनंदराव पाटील, बाळासाहेब यादव, मनोहर विभूते, अनिल विभूते उपस्थित होते.कारखाने-प्रशासनाची बैठक होणारटेंभू आणि ताकारी योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून मदत केली जाईल, परंतु शेतकºयांनी पैसे भरुन सहकार्य करावे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. कारखान्यांकडून पैसे वसुलीसाठी जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्याचे आश्वासनही अधिकाºयांनी दिल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.