शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

सांगलीत कृष्णेची पाणी पातळी २३ फुटांवर

By admin | Updated: August 5, 2016 02:03 IST

वेगाने वाढ : दिवसभर रंगला ऊन-पावसाचा खेळ; चोवीस तासात नदीचे पाच फुटाने पाणी वाढले

सांगली : चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणेचे पाणी पात्राबाहेर पडले असतानाच, आता संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी आता २३ फुटांवर गेली आहे. चोवीस तासात पाच फुटाने पाणी वाढले आहे. पावसाचा जोर कायम राहिला, तर शुक्रवारी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने जोर लावला आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यातच चांदोली धरणातील विसर्गामुळे आता हरिपुरातील संगमाच्या ठिकाणी वारणा नदीच्या पाण्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे हरिपूर ते मिरज या पट्ट्यात नदीचे पात्र विस्तारत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ बुधवारी सायंकाळी १८ फूट पाणी पातळी होती. गुरुवारी सायंकाळी ती २३ फुटांवर गेली होती. त्यामुळे कृष्णाकाठीही आता चिंतेचे वातावरण पसरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जुलैप्रमाणेच आॅगस्टमध्येही शहराच्या नदीकाठच्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाला, तर पुराचा धोका टळू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या लोकांचे लक्ष पावसाकडे आणि वाढणाऱ्या नदीच्या पाणी पातळीकडे लागले आहे. गेल्या चोवीस तासात सांगली, मिरज, इस्लामपूर, पलूस, तासगाव, शिराळा, विटा याठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या. सांगली, मिरज परिसरात गुरुवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. काहीवेळ इंद्रधनुष्यानेही या वातावरणात रंग भरले. पावसाचा मुक्काम कायम असल्याने सांगली, मिरजेला जलमय स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्ते, क्रीडांगणे, सखल भाग, गुंठेवारी, खुले भूखंड, प्लॉट अशा सर्वच ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहिले आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक गुरुवारी तिसऱ्यादिवशीही विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत. (प्रतिनिधी)‘चांदोली’त अतिवृष्टी : वारणा पात्राबाहेरवारणावती : चांदोली धरण परिसरात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने तीन दिवसात २.८ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पावसामुळे वारणा धरणात प्रचंड प्रमाणात पाणी येत असल्याने धरणाच्या वीज निर्मिर्ती केंद्रातून ८६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टी झाली आहे. गेल्या चोवीस तासात ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकू ण १७४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात सलग चार दिवस पावसाचा जोर कायम असल्याने अतिवृष्टीची नोंद झाली होती. यावेळीही सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टी होत आहे. यामुळे चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. वाढत्या पाण्याचा विचार आणि मुसळधार पाऊस यामुळे जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू क रण्यात आला आहे. ८६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग व ओढ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. वारणा नदीच्या पोटमळीतील ऊस व भात पिकात पाणी घुसले आहे.