शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भारनियमनाने पाणीटंचाई

By admin | Updated: June 21, 2017 00:51 IST

एक्स्प्रेस फिडरचे कोट्यवधी वाया : आयुक्तांच्या नोटिशीला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून सांगली व कुपवाड या दोन शहरातील नागरिकांना मंगळवारी पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी एक्स्प्रेस फिडरवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण हा खर्च आता पाण्यात गेला आहे. त्यात आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पाणीपुरवठ्याची वीज खंडीत केल्यास आपत्ती निवारण कायद्यान्वये कारवाई करण्याची नोटीसही वीज मंडळाला बजाविली होती. पण या नोटिशीलाही वीज कंपनीने केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. सांगली व कुपवाड शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी विकास महाआघाडीच्या काळात एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आले. या फिडरपोटी महापालिकेने मोक्याच्या जागा वीज कंपनीला दिल्या. एक्स्प्रेस फिडर होऊन सात-आठ वर्षे होत आली, तरीही एक्स्प्रेस फिडरचा फायदा अद्यापही महापालिकेला मिळू शकला नाही. उलट वीज मंडळाने आपला स्वायत्तपणा दाखवत दर मंगळवारी कामासाठी दिवसभर भारनियमन सुरुच ठेवले आहे. यामुळे ज्या ज्या वेळेला मंगळवारी वीजपुरवठा खंडीत होतो,तेव्हा तेव्हा शहराला पाणीटंचाईची झळ बसते. केवळ मंगळवारपुरताच हा विषय मर्यादित रहात नाही. त्यानंतर सलग दोन दिवस सांगली व कुपवाडचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतो. महापालिका प्रशासनाला, पदाधिकाऱ्यांच्या आदेशालाही वीज मंडळ जुमानतच नाही. गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे महापालिकेवर येत आहेत. त्याचीच दखल घेत काही दिवसापूर्वी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत वीज मंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत वीज मंडळाला नोटीसही बजावली होती. या नोटिशीलाही वीज मंडळाने अक्षरश: केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते. त्याचा प्रत्यय पुन्हा मंगळवारी आला. दिवसभर शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे सांगली व कुपवाड या दोन शहराला सकाळी आठनंतर पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दोन्ही शहरातील गावठाण व उपनगरात पाण्याची टंचाई जाणवत होती. काही भागात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला. सातत्याने वीज पुरवठा खंडीत होऊन त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.