शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

सांगलीत ‘वालचंद बचाओ’ अभियान

By admin | Updated: May 31, 2016 00:25 IST

दीपक शिंदे-म्हैसाळकर : बुधवारी सांगलीत मेळावा

सांगली : सांगलीतील प्रतिष्ठित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सध्या घडत असलेल्या घटनांच्या निषेधार्थ व महाविद्यालय वाचविण्यासाठी ‘वालचंद बचाओ’ अभियान हाती घेण्यात येणार आहे. यासाठी बुधवार, दि. १ जून रोजी सांगलीतील राजमती भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. वालचंद महाविद्यालयात काही संधिसाधू मंडळींनी गुंडगिरी व दहशत माजवित ताबा घेतला आहे. कायद्याने स्थापन झालेल्या व राज्य शासनाची अधिकृत मान्यता असलेल्या नियामक मंडळाने नियुक्त केलेले संचालक जी. व्ही. परीशवाड यांना जबरदस्तीने पदमुक्त केले आहे. त्यांच्याजागी बेकायदेशीरपणे कोणताही अधिकार नसताना नवीन संचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व घटनांचा गंभीर परिणाम महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीवर होत असून, संस्थेच्या देदीप्यमान इतिहासाला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. वास्तविक याच मंडळींनी महाराष्ट्र टेक्निकल सोसायटीचा ताबाही असाच बेकायदेशीर पद्धतीने घेतला असून, त्याविरोधात न्यायालयीन पातळीवर प्रक्रिया सुरू आहे, असे पत्रकात म्हटले आहे.या महाविद्यालयाचे कार्य व्यवस्थित व पूर्वीप्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून चालविण्यासाठी शासनाने योग्य ती दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन करून शिंदे म्हणाले की, वालचंद महाविद्यालयातील निषेधार्ह घटनांच्या विरोधात व महाविद्यालय वाचविण्यासाठी १ जून रोजी सायंकाळी पाच वाजता नेमिनाथनगरातील राजमती भवन येथे मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)वाद वाढला--वालचंद महाविद्यालयाच्या वाद उफाळून आला आहे. एमटीईने महाविद्यालयाचा ताबा घेतल्याने नियामक मंडळ अस्वस्थ आहे. नियामक मंडळाकडून पोलिसांत तक्रार केली आहे. आता या वादात बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून भाजपचे आणखी एक नेते उतरले आहे. त्यामुळे हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.