शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नालेसफाईला मुहूर्त लागणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:48 IST

महापालिकेच्या नालेसफाई मोहिमेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मे महिन्याच्या सुरुवातीपासून नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. पण यंदा प्रशासनाने अद्याप निविदा प्रक्रियाच राबविलेली नाही. त्यामुळे नालेसफाईला विलंब लागणार आहे. परिणामी वेळेत नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण होण्याबाबतही साशंकता आहे. पावसाळा महिन्यावर आला असून, ही सफाईची मोहीम सुरू नसल्याने ऐन पावसाळयाच्या तोंडावर सफाईसाठी धावाधाव होणार आहे.

ठळक मुद्देसांगलीत नालेसफाईला मुहूर्त लागणार कधी?ऐन पावसाळयाच्या तोंडावर धावाधाव होणार

सांगली : महापालिकेच्या नालेसफाई मोहिमेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मे महिन्याच्या सुरुवातीपासून नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. पण यंदा प्रशासनाने अद्याप निविदा प्रक्रियाच राबविलेली नाही. त्यामुळे नालेसफाईला विलंब लागणार आहे. परिणामी वेळेत नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण होण्याबाबतही साशंकता आहे. पावसाळा महिन्यावर आला असून, ही सफाईची मोहीम सुरू नसल्याने ऐन पावसाळयाच्या तोंडावर सफाईसाठी धावाधाव होणार आहे.सांगली शहरात ड्रेनेजव्यवस्था कालबाह्य झाल्याने प्रत्येक पावसाळयात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहते. शहरातील मारुती चौक, शिवाजी पुतळा, शिवाजी मंडई, स्टेशन रोड आदी शहरांच्या मुख्य भागातील प्रमुख रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचा डोहच साचत असतो.

पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने हे पाणी पाऊस पडल्यानंतर तास दोन तास थांबून राहते. याशिवाय शहराच्या उपनगरांमध्येही गटारीची सुविधा नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. शहरातील शंभर फुटी रोडवरही मोठी गटार आहे. ही गटार सध्या दहा-बारा फूट खोल असूनही कचरा, गाळाने अर्धी भरली आहे. याचीही सफाई केली नाही.दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेकडून कसलेच नियोजन होत नाही. मग घाईगडबडीत नाल्याची सफाई होते. पावसाळ्यात नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्याने उपनगरात पाणी शिरते. मुख्य चौक पाण्याने तुडुंब भरून जातात. ऐन पावसाळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सफाईच्या कामावर लावले जाते. हा दरवर्षीचा शिरस्ता बनला आहे.यंदाही नालेसफाईबाबत प्रशासकीय स्तरावर बैठकांचा फार्स सुरू आहे. पण प्रत्यक्षात कसलीच कार्यवाही झालेली नाही. त्यात लोकसभेच्या आचारसंहितेचा अडसर आहे. आचारसंहिता एप्रिल, मे महिन्यात लागणार, याची कल्पना साऱ्यांनाच होती. त्यामुळे मार्च महिन्यात नालेसफाईचे नियोजन करता आले असते. निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराकडून मे महिन्यात काम करून घेता आले असते. पण प्रशासनस्तरावर त्याबाबत कुणालाच गांभीर्य नसल्याचे दिसून आले.आता तर मे महिना उजाडत आला तरी निविदेच्या घोळातच प्रशासन अडकले आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर निविदा काढली जाणार. त्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी जाणार, मग ठेकेदाराला वर्कआॅर्डर, समन्स देऊन प्रत्यक्षात काम सुरू करण्यास मे महिन्याच्या शेवटचा आठवडा उजाडणार आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली