शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सांगलीत फळे, भाजीपाला मार्केटमध्ये कडकडीत बंद

By admin | Updated: July 5, 2016 00:05 IST

कोट्यवधीची उलाढाल ठप्प : शेतीमाल नियमन मुक्तीस विरोध

सांगली : शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्याची मुभा देण्याच्या नावाखाली बड्या व्यापाऱ्यांचेच हित शासनाकडून जोपासले जात असल्याचा आरोप करीत राज्यातील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी बंद पाळण्यात आला. शेतीमाल नियमन मुक्तीचा राज्य शासनाकडून निर्णय घेताना राज्यातील सर्व बाजार समित्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यभर पाळण्यात आलेल्या या बंदमध्ये सांगलीतील विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमधील व्यापारी व इतर घटकांनी सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळला. या आंदोलनात फळ मार्केटमधील सर्व व्यापारी सहभागी झाल्याने सोमवारी फळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. या बंदमुळे बाजार समितीची आजची एक कोटीची उलाढाल ठप्प झाली होती. दरम्यान, राज्यातील प्रतिनिधींच्या पुण्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने, आता पुन्हा एकदा ११ जुलैला बैठक बोलाविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार समितीत आणल्यानंतर त्यास रास्त भाव मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी जादा पैसे मोजावे लागत असल्याने, यास आळा घालण्यासाठी राज्य शासनाने फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा आदी शेतीमाल बाजार समिती नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमन मुक्तीच्या या निर्णयाविरोधात राज्यातील बाजार समित्यांमध्ये असंतोष आहे. केंद्राच्या दबावामुळे बड्या भांडवलदार व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समित्यांचे म्हणणे आहे. या नियमनात सर्व बाजार समित्यांचा समावेश करावा, या मागणीसाठीही सोमवारी बंद पाळण्यात आला. यात फ्रूट असोसिएशनचे शिवाजी सगरे व कांदा-बटाटा असोसिएशनचे अभिनंदन निलाखे, राजेश पोपटानी व सर्व व्यापारी सहभागी झाले होते. या बंदमुळे कांदा, बटाटा, लसूण आणि फळे व भाजीपाल्याचे व्यवहार होऊ शकले नाहीत. या बैठकीला व्यापारी, हमाल संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मार्केटमध्ये शुकशुकाट ; शेतकऱ्याचे नुकसानया बंद आंदोलनामुळे नेहमीच व्यापारी, शेतकरी व ग्राहकांच्या वर्दळीने गर्दी असलेल्या कोल्हापूर रस्त्यावरील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी सोमवारी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन करण्यात आले होते. पण सांगलीत आंदोलन सुरू असल्याची कल्पना नसलेल्या कर्नाटकातील एका शेतकऱ्याने कलिंगडे विक्रीसाठी आणली होती. मात्र, बंद व सध्या कलिंगडांना मागणीही नसल्याने या शेतकऱ्याचा माल अक्षरश: दोन दिवसांपासून पावसात भिजत आहे. विक्रीच्या अपेक्षेने आलेल्या या शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागले.राज्य संघटनेच्या निर्णयाप्रमाणे सांगलीतील भूमिकाराज्याच्या बैठकीत जे निर्णय होतील, त्याची अंमलबजावणी सांगलीतही केली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या बैठकीवर पुढील आंदोलनाची दिशा अवलंबून आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.