सांगली : मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने सांगली शहर जलयम झाले. शहरातील स्टेशन चौक, मारुती चौक, झुलेलाल चौकात गुडघाभर पाणी साचले होते, तर उपनगरे चिखलात रुतली होती. गुंठेवारीतील नागरिकांची तर दैना उडाली असून सर्वत्र दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल दीड तास पावसाने झोडपून काढले. या पावसाने शहरवासीयांची दैना उडाली. शासकीय कर्मचारी कार्यालयातच अडकून पडले होते. शहरातील स्टेशन चौकात गुडघाभर पाणी साचून होते. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ उडत होती. अनेक वाहने रस्त्यावर बंद पडली होती. स्टेशन चौकाच्या दुतर्फा पाणी साचून होते. महापालिका मुख्यालय, काँग्रेस भवनसमोर पाणी होते. आंबेडकर क्रीडांगणालाही तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. झुलेलाल चौक, मारुती चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मारुती चौकातील भाजी, फळ विक्रेत्यांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. गुंठेवारीत पालिकेने ड्रेनेजच्या चरी खोदल्या आहेत. उपनगरांत पाणी व ड्रेनेजसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खुदाई झाली आहे. या चरी अद्याप बुजविलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. शामरावनगर, आप्पासाहेब पाटीलनगर येथे पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा नसल्याने, रस्ते, गटारी, भूखंडावरून पाणी वाहत होते. (प्रतिनिधी)$$्निरेल्वे रुळ पाण्यात !विश्रामबाग येथील रेल्वे रूळ प्रथमच पाण्यात गेला होता. त्यामुळे रेल्वेची वाहतूकही संथगतीने सुरू होती. मारुती चौक पूर्णत: पाण्याखाली गेला होता. आनंद चित्रमंदिरापर्यंत पाणी शिरले होते. राजवाडा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून होते. झुलेलाल चौक, आंबेडकर रस्ता पाण्याखाली होता.शामरावनगर, आप्पासाहेब पाटीलनगर, रामकृष्ण सोसायटी, त्रिमूर्ती कॉलनी परिसरात चिखलाचे साम्राज्यशहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक दोन तास विस्कळीत
एका पावसात सांगली जलमय
By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST