शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : शेतकरी बिलांच्या प्रतीक्षेत, साखरेच्या दराची घसरणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:40 IST

सांगली जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. तरीही जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांची शंभर टक्के उसाची बिले दिली नाहीत. माणगंगा (आटपाडी) २८ टक्के, तर महांकाली (कवठेमहांकाळ) यांनी केवळ ५० टक्केच बिले दिली आहेत.

ठळक मुद्देशेतकरी बिलांच्या प्रतीक्षेत, साखरेच्या दराची घसरणच माणगंगाकडून २, तर महांकालीची ५० टक्के बिले अदा

सांगली : जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. तरीही जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांची शंभर टक्के उसाची बिले दिली नाहीत. माणगंगा (आटपाडी) २८ टक्के, तर महांकाली (कवठेमहांकाळ) यांनी केवळ ५० टक्केच बिले दिली आहेत. सध्या कारखाने कधी ऊस बिले देणार याकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी विक्रमी ९८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याप्रमाणेच महाराष्ट्रात आणि देशातही साखरेचे उत्पादन जादाच झाले आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या साखरेचे दर कमीच होत आहेत.

गुरुवारी प्रति क्विंटल साखर २८०० ते २७०० रुपये दर असल्याचे साखर कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून साखरेचे दर कमीच होत असल्यामुळे कारखानदारांची आर्थिक कोंडी झाली आहे.

राज्य बँकेनेही साखरेच्या पोत्यांचे मूल्यांकन कमी केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यात अडचणी येत असल्याचे साखर कारखानदार सांगत आहेत. हे जरी खरे असले तरी एफआरपीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही कारखानदारांकडून शेतकऱ्यांना बिले मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

याबद्दल साखर संचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता, सांगली जिल्ह्यातील वसंतदादा (श्री दत्त इंडिया) आणि मोहनराव शिंदे याच कारखान्यांनी बिले दिली आहेत. उर्वरित १३ साखर कारखान्यांनी अद्याप बिले दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे.आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याने दि. १५ एप्रिलपर्यंत सर्वात कमी म्हणजे केवळ २८ टक्केच बिले दिली आहेत. या कारखाना प्रशासनावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

महांकाली साखर कारखान्यानेही ५० टक्केपर्यंतच बिले दिली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची बिले मिळाली नाहीत. या कारखान्यांबद्दलही साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी झाल्या आहेत. त्यानुसार या कारखान्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री या साखर कारखाना प्रशासनानेही ७४ टक्के शेतकºयांनाच बिले दिली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची बिले थांबली आहेत. हुतात्मा, सोनहिरा, विश्वासराव नाईक, राजारामबापू या साखर कारखान्यांनीही अद्याप शेतकऱ्यांना शंभर टक्के रक्कम दिली नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील आकडेवारीवरुन दिसत आहे.शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांकडे बलाबाबत तक्रारी केल्यानंतर, साखरेचे दर उतरले असल्याचे एकमेव कारण सांगितले जात आहे. साखर कारखानदारांकडून बिले मिळत नसल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने न्याय देण्याची गरज आहे, अशी मागणीही ऊस उत्पादक शेतकरी करु लागला आहे. याकडे सरकार आणि संघटनांचेही लक्ष नाही.कारखान्यांच्या घोषणा हवेतजिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गळीत हंगाम चालू करताना एफआरपी आणि अधिक २०० रुपये दराची घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणे कारखान्यांनी बिले दिली नाहीत. अनेक कारखान्यांनी एफआरपीचीही रक्कम दिली नाही. यामुळे कारखानदारांना घोषणेचा विसरच पडला की काय?, असा शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.साखरेचे दर कमी झाले आहेत ही वस्तुस्थित लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने घोषणा केलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची गरज आहे. पण, सरकारही घोषणा करण्यातच धन्यता मानत आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने