सांगली-विटा मार्गाला विटा शहरात आणि तासगावात विजापूर-गुहागर हे राष्ट्रीय मार्ग मिळतात. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणाचे घोडे अद्यापतरी अडले आहे. आता बारामती विटा तासगाव सांगली असा नवीन राष्ट्रीय महामार्ग करण्यात येत असून त्यासाठी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सांगली विटा मार्ग पुढे सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतुकीचा ताण आहे. ५५ किलोमीटर अंतर असलेल्या या मार्गावर तासगावपर्यंत केवळ तीन गावे लागतात त्यामुळे विटा ते तासगाव मार्गावर तुलनेने वाहतूक कमी असते. मात्र, तासगाव शहरातच आटपाडीहून आलेला मार्ग मिळत असल्याने तिथून वाहतुकीचा ताण वाढत आहे. कुमठेफाटा येथून अजून वाहतूक वाढते तर पुढे कवलापूर बुधगाव आणि माधवनगर या मोठ्या गावांना पार करून सांगलीत प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. कवलापूर ते सांगली या ७ किलोमीटरसाठी पाऊण तासाहून अधिक कालावधी लागतो आहे.
चौकट
बायपासचीच मात्रा
या मार्गावर तासगाव शहरासह कवलापूर, बुधगाव, माधवनगरमध्ये गावातूनच मार्ग जात असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. गाळप हंगाम सुरू असतो त्यावेळी तर अडचणीत वाढच होते त्यामुळे विटा, आटपाडीहून येणाऱ्यांना तासगावला बायपास आणि कवलापूर, बुधगाव येथे पर्यायी मार्ग झाल्यास हा मार्ग प्रशस्त ठरणार आहे.