शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत व्यापाऱ्यांचे बुधवारी ‘भीक मांगो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST

सांगली : कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून सातत्याने कडक निर्बंध लादले जात आहेत. या निर्बंधामुळे बँकेचे हप्ते, ...

सांगली : कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून सातत्याने कडक निर्बंध लादले जात आहेत. या निर्बंधामुळे बँकेचे हप्ते, व्याज, कर्मचाऱ्यांचे पगार, दुकान भाड्यासह इतर खर्च भागविणेही व्यापाऱ्यांना मुश्किल झाले आहे. या नुकसानीला शासन व जिल्हा प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप करीत शहरातील हरभट रोड येथे बुधवारी व्यापाऱ्यांच्यावतीने ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

व्यापारी एकता असोसिएशनसह अत्यावश्यक सेवेत नसलेल्या विविध संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सततच्या टाळेबंदी, कठोर निर्बंध, दंडात्मक कारवाईचा निषेध करण्यात आला. बैठकीनंतर शहा म्हणाले की, पाॅझिटिव्हिटी दरानुसार निर्बंधांचे निकष केवळ महाराष्ट्रातच आहेत. इतर राज्यांत लाॅक अथवा अनलाॅक हे दोनच पर्याय आहेत. कडक निर्बंध लादूनही जिल्ह्यातील रुग्णसंख्या जैसे थेच आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद असतानाही रुग्णसंख्या घटलेली नाही. उलट हे व्यापारी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतात. तरीही गेल्या तीन महिन्यांपासून ही दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे व्यावसायिक नुकसानीसह बँकेचे हप्ते, व्याज, कर्मचारी पगार, दुकान भाडे, घरखर्च, वीजबिल, स्थानिक कर, जीएसटीचा बोजा वाढत चालला आहे. या खर्चापोटी कसलीही मदत शासनाने केलेली नाही. त्यासाठीच बुधवारी हरभट रोडवर सकाळी साडेअकरा वाजता ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून व्यापार सुरू करण्याची ग्वाही दिली होती; पण पुन्हा लाॅकडाऊनचा आदेश काढला. प्रशासनाकडे स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे यापुढे प्रशासनाला कोणतेही निवेदन देणार नाही. उलट जबरदस्तीने दुकानदारांकडून दंड वसूल केला जात आहे. हा खंडणी वसुलीचाच प्रकार असून, त्याचाही आम्ही निषेध करतो, असे शहा म्हणाले. आमदार, खासदार, नगरसेवकांनीही आंदोलनात सहभागी व्हावे. अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांनीही बुधवारी लाक्षणिक बंद पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

चौकट

टास्क फोर्स बरखास्त करा

सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली आहे. टास्क फोर्सनेच अर्धवट लाॅकडाऊनचा सल्ला दिल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे हा टास्क फोर्सच मुख्यमंत्र्यांनी बरखास्त करावा. स्थानिक पातळीवर जिल्हानिहाय समिती स्थापन करून त्यांच्याशी चर्चा करून उपाययोजना आखाव्यात, अशी मागणीही शहा यांनी केली.