शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत व्यापाऱ्यांचे बुधवारी ‘भीक मांगो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST

सांगली : कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून सातत्याने कडक निर्बंध लादले जात आहेत. या निर्बंधामुळे बँकेचे हप्ते, ...

सांगली : कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून सातत्याने कडक निर्बंध लादले जात आहेत. या निर्बंधामुळे बँकेचे हप्ते, व्याज, कर्मचाऱ्यांचे पगार, दुकान भाड्यासह इतर खर्च भागविणेही व्यापाऱ्यांना मुश्किल झाले आहे. या नुकसानीला शासन व जिल्हा प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप करीत शहरातील हरभट रोड येथे बुधवारी व्यापाऱ्यांच्यावतीने ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

व्यापारी एकता असोसिएशनसह अत्यावश्यक सेवेत नसलेल्या विविध संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सततच्या टाळेबंदी, कठोर निर्बंध, दंडात्मक कारवाईचा निषेध करण्यात आला. बैठकीनंतर शहा म्हणाले की, पाॅझिटिव्हिटी दरानुसार निर्बंधांचे निकष केवळ महाराष्ट्रातच आहेत. इतर राज्यांत लाॅक अथवा अनलाॅक हे दोनच पर्याय आहेत. कडक निर्बंध लादूनही जिल्ह्यातील रुग्णसंख्या जैसे थेच आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद असतानाही रुग्णसंख्या घटलेली नाही. उलट हे व्यापारी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतात. तरीही गेल्या तीन महिन्यांपासून ही दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे व्यावसायिक नुकसानीसह बँकेचे हप्ते, व्याज, कर्मचारी पगार, दुकान भाडे, घरखर्च, वीजबिल, स्थानिक कर, जीएसटीचा बोजा वाढत चालला आहे. या खर्चापोटी कसलीही मदत शासनाने केलेली नाही. त्यासाठीच बुधवारी हरभट रोडवर सकाळी साडेअकरा वाजता ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून व्यापार सुरू करण्याची ग्वाही दिली होती; पण पुन्हा लाॅकडाऊनचा आदेश काढला. प्रशासनाकडे स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे यापुढे प्रशासनाला कोणतेही निवेदन देणार नाही. उलट जबरदस्तीने दुकानदारांकडून दंड वसूल केला जात आहे. हा खंडणी वसुलीचाच प्रकार असून, त्याचाही आम्ही निषेध करतो, असे शहा म्हणाले. आमदार, खासदार, नगरसेवकांनीही आंदोलनात सहभागी व्हावे. अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांनीही बुधवारी लाक्षणिक बंद पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

चौकट

टास्क फोर्स बरखास्त करा

सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली आहे. टास्क फोर्सनेच अर्धवट लाॅकडाऊनचा सल्ला दिल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे हा टास्क फोर्सच मुख्यमंत्र्यांनी बरखास्त करावा. स्थानिक पातळीवर जिल्हानिहाय समिती स्थापन करून त्यांच्याशी चर्चा करून उपाययोजना आखाव्यात, अशी मागणीही शहा यांनी केली.